म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रेल्वे मार्गांवरील अपघात रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे ५८० कोटी रु.चा प्रस्ताव धाडण्यात आला असून, त्यासाठी तिन्ही मार्गांवरील २२ धोकादायक ठिकाणे निवडण्यात आली आहेत.
पादचारी पूल, भुयारी मार्गाऐवजी शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडण्याचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या २२ ठिकाणांचा रेल्वेने शोध घेतला. या स्थळांवर विशेष योजना राबवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यात एमयूटीपी-३अंतर्गत संरक्षक भिंत, पादचारी पूल, कुंपण उभारण्याची योजना आहे.
त्यासाठी ५८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अलीकडेच दिल्लीहून आलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे महामंडळ आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् यांनी केलेल्या सर्वेक्षणातील स्थळांची माहिती घेतली होती. त्याच्या मदतीने ही ठिकाणे ठरवण्यात झाली.
रेल्वे मार्गांवरील अपघात रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे ५८० कोटी रु.चा प्रस्ताव धाडण्यात आला असून, त्यासाठी तिन्ही मार्गांवरील २२ धोकादायक ठिकाणे निवडण्यात आली आहेत.
पादचारी पूल, भुयारी मार्गाऐवजी शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडण्याचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या २२ ठिकाणांचा रेल्वेने शोध घेतला. या स्थळांवर विशेष योजना राबवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यात एमयूटीपी-३अंतर्गत संरक्षक भिंत, पादचारी पूल, कुंपण उभारण्याची योजना आहे.
त्यासाठी ५८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अलीकडेच दिल्लीहून आलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे महामंडळ आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् यांनी केलेल्या सर्वेक्षणातील स्थळांची माहिती घेतली होती. त्याच्या मदतीने ही ठिकाणे ठरवण्यात झाली.