म. टा. प्रतिनिधी, मुंबई
विधान परिषदेच्या एका जागेसाठी ३ जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उपसभापती वसंतराव डावखरे यांना निवडून आणण्यासाठी पक्षांतर्गत मतभेद दूर करण्याची जबाबदारी ठाणे व पालघर जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर टाकण्यात आली आहे. दुसरीकडे सुमारे १३० मतांची रसद पुरविणाऱ्या बहुजन विकास आघाडीने डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील, प्रमोद हिंदुराव, सुनील भुसारा, आनंद परांजपे आदी नेत्यांच्या बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. ठाणे व पालघर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत डावखरे आणि शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्यात थेट लढत आहे. मध्यंतरी शिवसेनेच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भेटून निवडणुकीत सहकार्य मागितले होते. मात्र बुधवारी डावखरे जुने निकटचे मित्र असल्याचे सांगत ठाकूर यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला.
दरम्यान, १० जूनला होणाऱ्या १० जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे दोन जागांची मागणी केली आहे. याबाबत काँग्रेस उच्च पदस्थ गुरुवारी दिल्लीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी ३ जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उपसभापती वसंतराव डावखरे यांना निवडून आणण्यासाठी पक्षांतर्गत मतभेद दूर करण्याची जबाबदारी ठाणे व पालघर जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर टाकण्यात आली आहे. दुसरीकडे सुमारे १३० मतांची रसद पुरविणाऱ्या बहुजन विकास आघाडीने डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील, प्रमोद हिंदुराव, सुनील भुसारा, आनंद परांजपे आदी नेत्यांच्या बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. ठाणे व पालघर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत डावखरे आणि शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्यात थेट लढत आहे. मध्यंतरी शिवसेनेच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भेटून निवडणुकीत सहकार्य मागितले होते. मात्र बुधवारी डावखरे जुने निकटचे मित्र असल्याचे सांगत ठाकूर यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला.
दरम्यान, १० जूनला होणाऱ्या १० जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे दोन जागांची मागणी केली आहे. याबाबत काँग्रेस उच्च पदस्थ गुरुवारी दिल्लीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.