अ‍ॅपशहर

लॉकडाऊन: मुंबईतील अपघाती मृत्यू ६५ टक्क्यांनी घटले

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात रेल्वे आणि रस्ते वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहे. त्यामुळं यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते आणि रेल्वे अपघातांमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण ६५ टक्क्यांंनी घटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2020, 11:36 am
मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे अपघातांत होणारे मृत्यूचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये रेल्वे अपघातांत होणारे मृत्यू ६५ टक्के, तर रस्ते अपघातांत होणारे मृत्यूचे प्रमाण ७५ टक्क्यांनी घटले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai during lockdown


मुंबईत मार्च आणि एप्रिलमध्ये रस्ते अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी २०१९ मध्ये याच कालावधीत ८० जणांचे अपघाती मृत्यू झाले होते. तर लॉकडाऊनच्या काळात उपनगरी रेल्वे सेवा बंद असल्यानं अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या वर्षीच्या दोन महिन्यांत १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये ४३१ मृत्यू झाले होते. हे प्रमाण जवळपास ६५ टक्क्यांनी कमी झाले आहे.

लॉकडाउन ३.०: पाहा, देशात आज पासून काय सुरू, काय बंद?
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने! गणेशोत्सव समितीचा निर्णय

गेल्या महिन्यात फक्त मालगाड्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष ट्रेन चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळं अपघाताचं प्रमाण घटलं आहे. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू हा रेल्वे रुळ ओलांडताना झाला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. एप्रिलमध्ये रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार पादचारी, तीन दुचाकीस्वार आणि एक रिक्षातील प्रवासी होता. दोन अपघात हे चेंबूर आणि ट्रॉम्बे येथे घडले होते.

कोल्हापूर, औरंगाबादेत उपचारावेळी दोघांचा मृत्यू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज