म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेच्या निवडणुकीत युती करण्यासंदर्भातील शिवसेना भाजप या पक्षांमधील कोंडी अद्याप फुटली नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीला गेले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी शिवसेनेसोबत युती करायची की नाही या विषयावर चर्चा करणार आहेत.
पालिकेच्या निवडणुकीत युती करण्याबाबत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील चर्चा थांबली आहे. शिवसेनेने ६० जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला भाजपने स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आलेला नाही. दरम्यान, भाजपने मंगळवारी १९० जागांची यादी अंतिम केली आहे. शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप रामदास आठवले यांच्या आरपीआय गटाला सोबत घेऊन स्वबळावर लढणार आहे.
पालिका निवडणुकीत सेनेसोबत युती करायची की नाही, याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे मंगळवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले. त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा होणार आहे. १०० पेक्षा कमी जागा घेवू नका, असे आदेश अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेले होते. मात्र जागावाटपात ६०पेक्षा जास्त जागा देण्यास शिवसेनेने भाजपला नकार दिला आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत युती करण्यासंदर्भातील शिवसेना भाजप या पक्षांमधील कोंडी अद्याप फुटली नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीला गेले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी शिवसेनेसोबत युती करायची की नाही या विषयावर चर्चा करणार आहेत.
पालिकेच्या निवडणुकीत युती करण्याबाबत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील चर्चा थांबली आहे. शिवसेनेने ६० जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला भाजपने स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आलेला नाही. दरम्यान, भाजपने मंगळवारी १९० जागांची यादी अंतिम केली आहे. शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप रामदास आठवले यांच्या आरपीआय गटाला सोबत घेऊन स्वबळावर लढणार आहे.
पालिका निवडणुकीत सेनेसोबत युती करायची की नाही, याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे मंगळवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले. त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा होणार आहे. १०० पेक्षा कमी जागा घेवू नका, असे आदेश अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेले होते. मात्र जागावाटपात ६०पेक्षा जास्त जागा देण्यास शिवसेनेने भाजपला नकार दिला आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.