म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या आरे कॉलनीतील जंगलाला लागलेली आग आता आटोक्यात आली असली तरी या प्रश्नावर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या आगीबाबत शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांनी आगीवर संशय व्यक्त केला आहे. या आगीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या आगीच्या न्यायालयीन चौकशीचा आग्रह धरला आहे.
आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या आगीची आपण गंभीर दखल घेतली असून, पर्यावरणाचा समतोलाच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र आपण पोलिस तसेच वनविभागाला देणार आहोत असे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी सकाळी आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. ही घटना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांभीर्याने घेतली आहे. आग लागली नाही तर आग लावलेली आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला. वारंवार अशा प्रकारच्या आगी लागतातच कशा असा सवाल त्यांनी केला. नाममात्र दराने सरकारकडून जमिनी घेऊन तिथे आगी लावून मराठी माणसांना हुसकावण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतात, मग अशा आगी लागतात त्या ठिकाणी ते झाडे का लावत नाहीत? या आगीची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून मनसे हे प्रकरण हरित लवादाकडे नेणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या आरे कॉलनीतील जंगलाला लागलेली आग आता आटोक्यात आली असली तरी या प्रश्नावर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या आगीबाबत शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांनी आगीवर संशय व्यक्त केला आहे. या आगीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या आगीच्या न्यायालयीन चौकशीचा आग्रह धरला आहे.
आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या आगीची आपण गंभीर दखल घेतली असून, पर्यावरणाचा समतोलाच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र आपण पोलिस तसेच वनविभागाला देणार आहोत असे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी सकाळी आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. ही घटना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांभीर्याने घेतली आहे. आग लागली नाही तर आग लावलेली आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला. वारंवार अशा प्रकारच्या आगी लागतातच कशा असा सवाल त्यांनी केला. नाममात्र दराने सरकारकडून जमिनी घेऊन तिथे आगी लावून मराठी माणसांना हुसकावण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतात, मग अशा आगी लागतात त्या ठिकाणी ते झाडे का लावत नाहीत? या आगीची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून मनसे हे प्रकरण हरित लवादाकडे नेणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.