म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करा, या मागणीसाठी पश्चिम रेल्वेच्या दादर पश्चिम स्थानकावर पत्रके चिकटवून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.
बुधवारी रात्री उशिरा अज्ञात कार्यकर्त्यांकडून दादर स्थानकातील फलकावर 'चैत्यभूमी' असे पत्रक चिकटवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्यांनी या फलकाजवळ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याचवेळी दादर (मध्य) स्थानकाबाहेर स्वामीनारायण मंदिराजवळही स्थानकाच्या नामांतरणासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, भीम आर्मीचे महाराष्ट्रप्रमुख अशोक कांबळे यांना दादर रेल्वे स्थानकात येण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनामुळे दादर स्थानकातील मेल-एक्स्प्रेससह लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मध्य परिमंडळाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांचा विरोध
'दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची भीम आर्मीने केलेली मागणी चुकीची आहे. उठसूठ नामांतराची मागणी करणे चूक असून, त्याऐवजी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांना एक इतिहास असून, तो इतिहास पुसून टाकण्याचे उद्योग कोणी करता कामा नये', असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करा, या मागणीसाठी पश्चिम रेल्वेच्या दादर पश्चिम स्थानकावर पत्रके चिकटवून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.
बुधवारी रात्री उशिरा अज्ञात कार्यकर्त्यांकडून दादर स्थानकातील फलकावर 'चैत्यभूमी' असे पत्रक चिकटवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्यांनी या फलकाजवळ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याचवेळी दादर (मध्य) स्थानकाबाहेर स्वामीनारायण मंदिराजवळही स्थानकाच्या नामांतरणासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, भीम आर्मीचे महाराष्ट्रप्रमुख अशोक कांबळे यांना दादर रेल्वे स्थानकात येण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनामुळे दादर स्थानकातील मेल-एक्स्प्रेससह लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मध्य परिमंडळाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांचा विरोध
'दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची भीम आर्मीने केलेली मागणी चुकीची आहे. उठसूठ नामांतराची मागणी करणे चूक असून, त्याऐवजी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांना एक इतिहास असून, तो इतिहास पुसून टाकण्याचे उद्योग कोणी करता कामा नये', असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.