मुंबईः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांची युती होणार असल्याचे शिक्कामोर्तब आज भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांच्या युतीचे सरकार येणार आहे. परंतु, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे अद्याप ठरवण्यात आले नाही. निवडणूक निकालानंतर याचा निर्णय होईल, असे महत्त्वपूर्ण विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानानंतर पाटील यांनी हे विधान केल्याने या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हे तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर पाटील यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार
भाजपच्या उमेदवारांची यादी आज रात्री जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शिवसेना भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. जागा वाटप पूर्ण झाले असल्याने आज रात्री कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना भाजप युतीत सेनेच्या वाट्याला किती जागा आल्या. भाजप किती जागावर लढणार तसेच मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात आल्या आहेत. हे सर्व अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं अधोरेखित होत आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवून मित्र पक्षांना झुलवण्याचाही यामागे उद्देश असू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
आदित्यविरोधात उमेदवार देणार: अजित पवार
वंचितची जम्बो यादी; शिरस्करांचा पत्ता कापला
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हे तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर पाटील यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार
भाजपच्या उमेदवारांची यादी आज रात्री जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शिवसेना भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. जागा वाटप पूर्ण झाले असल्याने आज रात्री कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना भाजप युतीत सेनेच्या वाट्याला किती जागा आल्या. भाजप किती जागावर लढणार तसेच मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात आल्या आहेत. हे सर्व अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं अधोरेखित होत आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवून मित्र पक्षांना झुलवण्याचाही यामागे उद्देश असू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
आदित्यविरोधात उमेदवार देणार: अजित पवार
वंचितची जम्बो यादी; शिरस्करांचा पत्ता कापला