अ‍ॅपशहर

आताची मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि आता ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2022, 10:41 pm
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि आता ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना पत्र देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत ठाकरे सरकारच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन अमित शाह, महेश जेठमलानी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadanvis And Bhagat Singh Koshyari
देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारी


वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अचानक हालचाली वेगवान केल्या. काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फडणवीसांची चर्चा झाली. गेल्या आठवड्याभरातील ही फडणवीसांची पाचवी दिल्लीवारी असल्याचं बोललं जातं. दिल्लीहून परतल्यावर आज संध्याकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पुन्हा एकदा भाजप नेत्यांची बैठक झाली होती. तिथून फडणवीस थेट राजभवनावर गेले.

राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

"माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष पद्धतीने भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची परिस्थिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आघाडीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार ठाकरे सरकारसोबत नाहीये. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीये. त्यामुळेच सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे. या पत्रावर राज्यपाल योग्य निर्णय घेतील. बहुमत सिद्ध करण्यासाठी उचित निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख