मुंबई : देवेंद्र फडणवीस हे गेल्या ४७ वर्षात पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरले. पण आता त्यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर ७२ तासातच फडणवीसांना राजीनामा देण्याची वेळ ओढावली. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त वसंतराव नाईक यांनीच फक्त पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
१९६० ला महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी १८ वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यापैकी शरद पवार हे चार वेळा, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील प्रत्येकी तीन वेळा, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांनी प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या तिसऱ्या विधानसभेत म्हणजेच १९६७ ते १९७२ या काळात वसंतराव नाईक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानही वसंतराव नाईक यांच्याच नावावर आहे. ते पहिल्यांदा १९६३ ला मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक यांनी ११ वर्ष म्हणजे १९७५ पर्यंत राज्याचं नेतृत्त्व केलं. यानंतर शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
शंकरराव चव्हाण यांनी नंतर राजीव गांधी आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे दीड वर्ष अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी होती. शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
उद्धव ठाकरे उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री बनले. पण ते एकदाही राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मुख्यमंत्री नव्हते. १९७८ ला सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. यानंतर तीन वेळा ते काँग्रेसचे आमदार असताना मुख्यमंत्री झाले.
१९९५ ला युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा १९९९ ला विजय मिळवला आणि कमबॅक केलं.
शरद पवारांच्या 'पॉवर गेम' पुढं सगळेच फिके
संन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवारांची माघार
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी (१९६० ते २०१९)
यशवंतराव चव्हाण, काँग्रेस
मारोतराव कन्नमवार, काँग्रेस
पीके सावंत, काँग्रेस
वसंतराव नाईक, काँग्रेस
शंकरराव चव्हाण, काँग्रेस
वसंतदादा पाटील, काँग्रेस यू
शरद पवार, काँग्रेस (समाजवादी)
ए. आर. अंतुले, काँग्रेस
बाबासाहेब भोसले, काँग्रेस
वसंतदादा पाटील, काँग्रेस
शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेस
शरद पवार, काँग्रेस
सुधाकरराव नाईक, काँग्रेस
शरद पवार, काँग्रेस
मनोहर जोशी, शिवसेना
नारायण राणे, शिवसेना
विलासराव देशमुख, काँग्रेस
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
अशोक चव्हाण, काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
देवेंद्र फडणवीस, भाजप
देवेंद्र फडणवीस, भाजप (३ दिवस)
१९६० ला महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी १८ वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यापैकी शरद पवार हे चार वेळा, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील प्रत्येकी तीन वेळा, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांनी प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या तिसऱ्या विधानसभेत म्हणजेच १९६७ ते १९७२ या काळात वसंतराव नाईक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानही वसंतराव नाईक यांच्याच नावावर आहे. ते पहिल्यांदा १९६३ ला मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक यांनी ११ वर्ष म्हणजे १९७५ पर्यंत राज्याचं नेतृत्त्व केलं. यानंतर शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
शंकरराव चव्हाण यांनी नंतर राजीव गांधी आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे दीड वर्ष अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी होती. शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
उद्धव ठाकरे उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री बनले. पण ते एकदाही राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मुख्यमंत्री नव्हते. १९७८ ला सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. यानंतर तीन वेळा ते काँग्रेसचे आमदार असताना मुख्यमंत्री झाले.
१९९५ ला युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा १९९९ ला विजय मिळवला आणि कमबॅक केलं.
शरद पवारांच्या 'पॉवर गेम' पुढं सगळेच फिके
संन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवारांची माघार
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी (१९६० ते २०१९)
यशवंतराव चव्हाण, काँग्रेस
मारोतराव कन्नमवार, काँग्रेस
पीके सावंत, काँग्रेस
वसंतराव नाईक, काँग्रेस
शंकरराव चव्हाण, काँग्रेस
वसंतदादा पाटील, काँग्रेस यू
शरद पवार, काँग्रेस (समाजवादी)
ए. आर. अंतुले, काँग्रेस
बाबासाहेब भोसले, काँग्रेस
वसंतदादा पाटील, काँग्रेस
शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेस
शरद पवार, काँग्रेस
सुधाकरराव नाईक, काँग्रेस
शरद पवार, काँग्रेस
मनोहर जोशी, शिवसेना
नारायण राणे, शिवसेना
विलासराव देशमुख, काँग्रेस
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
अशोक चव्हाण, काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
देवेंद्र फडणवीस, भाजप
देवेंद्र फडणवीस, भाजप (३ दिवस)