मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोडींचा उत्कर्षबिंदू गाठला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्याने स्थापन होऊ घातलेल्या भाजप सरकारचे 'भावी मुख्यमंत्री' मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतून (Shivsena) फुटून भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे (Maharashtra New CM Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन देऊ केले. भाजप पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राजभवनात आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकारपरिषद झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, राज्यातील सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ, असे मी अगोदरच सांगितले होते. राज्यातील जनतेच्या डोक्यावर आम्ही निवडणुका लादणार नाही, असेही मी म्हटले होते. त्यामुळेच आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपचा विधिमंडळ गट, १६ अपक्ष आणि लहान पक्षांचे आमदार एकत्र आले आहेत. आम्ही राज्यपालांना तसं पत्र दिले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. श्री एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपने हा निर्णय घेतला कारण, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. कुठलं तरी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही. ही तत्त्वांची आणि हिंदुत्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे.
एकनाथ शिंदेंनी मानले फडणवीसांचे आभार
स्वत:कडे १२० आमदारांचा पाठिंबा असून देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ आहेत. फडणवीस मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. फडणवीसांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मोदी-शहा-फडणवीसांचे खूप खूप आभार मानतो. आजची घटना ही ऐतिसाहिक घटना आहे. महाराष्ट्राला मजबूत सरकार दिसेल. आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे.
एकनाथ शिंदेंनी मानले फडणवीसांचे आभार
स्वत:कडे १२० आमदारांचा पाठिंबा असून देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ आहेत. फडणवीस मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. फडणवीसांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मोदी-शहा-फडणवीसांचे खूप खूप आभार मानतो. आजची घटना ही ऐतिसाहिक घटना आहे. महाराष्ट्राला मजबूत सरकार दिसेल. आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.