मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,' असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला. (Devendra Fadnavis bats for Arnab Goswami and Kangana Ranaut)
वाचा: 'या' तारखेपासून सुरू होणार मुंबई लोकल ट्रेन?
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत (Discussion on Supplementary Demand) ते बोलत होते. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. त्यासाठी त्यांनी गोस्वामी व कंगना प्रकरणाचा दाखला दिला. 'अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, ती चुकीचीच आहेत. मी त्याचा निषेधच करतो. त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. याच अर्णव गोस्वामी यांनी माझ्याही विरोधात 'मीडिया ट्रायल' चालवली होती. तीनदा चालवली होती. एकदा अमेरिकेत असताना माझ्या मागे कॅमेरे लावण्यात आले होते. मी तिथं गुंतवणूकदारांची भेट घेत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळंच काम करत होते. पण म्हणून भारतात आल्यानंतर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. त्यांना उत्तर दिलं. हा फरक आहे,' असं फडणवीस म्हणाले.
वाचा: महाराष्ट्रात आणीबाणी? शिवसेनेनं फडणवीसांना दिलं 'हे' उदाहरण
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेलाही फडणवीसांनी आक्षेप घेतला. 'खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे. पण इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्ही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू शकता. पण, मनात आलं म्हणून तुम्ही कोणाचं घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नाही. कंगनानं केवळ विरोधात ट्वीट केलं म्हणून तिचं घर तोडलं गेलं असं न्यायालयानं म्हटलं आहे,' याकडंही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. 'सत्ता डोक्यात जाता कामा नये. राज्य कारभार कितीही काळ चालवा. २५ वर्षे चालवा. २७ वर्षे चालवा, पण कायद्यानं चालवा,' असा चिमटाही त्यांनी काढला.
वाचा: मरिन ड्राइव्हवर फिरणाऱ्या मंत्र्याच्या हाती मुले जेव्हा मोबाइल सोपवतात...
वाचा: संसदेचं अधिवेशन रद्द झाल्यामुळं राज्यातील भाजप नेत्यांची गोची
वाचा: 'या' तारखेपासून सुरू होणार मुंबई लोकल ट्रेन?
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत (Discussion on Supplementary Demand) ते बोलत होते. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. त्यासाठी त्यांनी गोस्वामी व कंगना प्रकरणाचा दाखला दिला. 'अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, ती चुकीचीच आहेत. मी त्याचा निषेधच करतो. त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. याच अर्णव गोस्वामी यांनी माझ्याही विरोधात 'मीडिया ट्रायल' चालवली होती. तीनदा चालवली होती. एकदा अमेरिकेत असताना माझ्या मागे कॅमेरे लावण्यात आले होते. मी तिथं गुंतवणूकदारांची भेट घेत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळंच काम करत होते. पण म्हणून भारतात आल्यानंतर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. त्यांना उत्तर दिलं. हा फरक आहे,' असं फडणवीस म्हणाले.
वाचा: महाराष्ट्रात आणीबाणी? शिवसेनेनं फडणवीसांना दिलं 'हे' उदाहरण
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेलाही फडणवीसांनी आक्षेप घेतला. 'खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे. पण इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्ही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू शकता. पण, मनात आलं म्हणून तुम्ही कोणाचं घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नाही. कंगनानं केवळ विरोधात ट्वीट केलं म्हणून तिचं घर तोडलं गेलं असं न्यायालयानं म्हटलं आहे,' याकडंही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. 'सत्ता डोक्यात जाता कामा नये. राज्य कारभार कितीही काळ चालवा. २५ वर्षे चालवा. २७ वर्षे चालवा, पण कायद्यानं चालवा,' असा चिमटाही त्यांनी काढला.
वाचा: मरिन ड्राइव्हवर फिरणाऱ्या मंत्र्याच्या हाती मुले जेव्हा मोबाइल सोपवतात...
वाचा: संसदेचं अधिवेशन रद्द झाल्यामुळं राज्यातील भाजप नेत्यांची गोची