मुंबई : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा आदेश प्रमाण मानत देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. धक्कातंत्र वापरत फडणवीसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती. त्याचवेळी आपण मंत्रिमंडळात नसू, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर नड्डांनी फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आदेश दिले. यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया येण्याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये सामील होणार असल्याचं स्पष्ट केलं. शिंदेंच्या हाताखालीच माजी मुख्यमंत्री फडणवीस काम करणार असल्याचं स्पष्ट झालं.
मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात सहभागी होणारे फडणवीस हे पहिलेच नेते नाहीत. याआधी शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा पुढील सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.
शिवाजीराव पाटील निलंगेकर
काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जून १९८५ ते मार्च १९८६ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे. मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते त्यांच्याकडे होते.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी विश्वासानं एकनाथ शिंदेंवर जबाबदारी टाकली त्याचा हा परिणाम : शरद पवार
अशोक चव्हाण
त्याचप्रमाणे काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. एकदा सीएमच्या खुर्चीवर बसल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद स्वीकारले.
हेही वाचा : आधी उद्धव ठाकरेंना टोला, तोच नशिबाचा धागा पकडत राज ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा
मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात सहभागी होणारे फडणवीस हे पहिलेच नेते नाहीत. याआधी शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा पुढील सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.
शिवाजीराव पाटील निलंगेकर
काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जून १९८५ ते मार्च १९८६ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे. मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते त्यांच्याकडे होते.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी विश्वासानं एकनाथ शिंदेंवर जबाबदारी टाकली त्याचा हा परिणाम : शरद पवार
अशोक चव्हाण
त्याचप्रमाणे काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. एकदा सीएमच्या खुर्चीवर बसल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद स्वीकारले.
हेही वाचा : आधी उद्धव ठाकरेंना टोला, तोच नशिबाचा धागा पकडत राज ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा