अ‍ॅपशहर

धनंजय मुंडेंशी संपर्क झालाय : संजय राऊत

राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा दावा केला जात असला तरी धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्याही गोटात धाकधूक आहे. पण, 'धनंजय मुंडे यांच्याशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क झाला आहे, अजित पवारही परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही', असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आलंय, त्याबद्दल उद्याच्या ‘सामना’त वाचा, असंही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2019, 9:33 pm

भाजपला मोठा धक्का; काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा दावा केला जात असला तरी धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्याही गोटात धाकधूक आहे. पण, 'धनंजय मुंडे यांच्याशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क झाला आहे, अजित पवारही परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही', असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आलंय, त्याबद्दल उद्याच्या ‘सामना’त वाचा, असंही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut dhananjay munde



शपथविधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सकाळी लवकर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर येण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार काही आमदार सकाळी हजर झाले. पण नंतर जे घडलं ते आपल्यासाठीही अविश्वसनीय होतं, असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितलं. पण या सर्व घडामोडीत धनंजय मुंडे यांचा फोन स्विच ऑफ आहे. त्यांच्याशी अजूनही संपर्क झालेला नसल्याची माहिती आहे.

‘अजित पवारांना ब्लॅकमेल केलं’

भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. सर्व आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. अजित पवारही परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं.

फाटाफुटीचं असं राजकारण खूप पाहिलंय: पवार

शरद पवार-उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद

अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. अजित पवार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र आहेत आणि कारवाई होईल, असंही पवार म्हणाले. आमदारांनी पक्षाविरोधात काम केल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होईल आणि हे आमदार अपात्र ठरतील. पुन्हा पोटनिवडणूक लागल्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून त्या उमेदवाराला पाडतील, असंही पवारांनी बजावलं.

आता हरीभाऊ बागडे ठरणार 'किंगमेकर'

सकाळी-सकाळी शपथविधी

कुणालाही माहिती मिळू न देता राज्यात नवं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून निवडण्यात आले होते. गटनेता म्हणून सर्व आमदारांच्या सहीचं पत्र अजित पवार यांच्याकडे होतं. याच आधारावर राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि भाजपला सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज