‘धीमंत योगी’ प्रकाशन सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणाला तोंड देऊनही जगभरात हिंदू धर्म घट्ट पाळेमुळे रोवून आहे. याचे श्रेय आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्या परिश्रमाला जाते, अशी कृतज्ञता प्रा. मोहन आपटे यांनी सोमवारी व्यक्त केली. स्वामी विवेकानंद यांच्यावरील तुकाराम जाधवलिखित ‘धीमंत योगी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले, श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि संधीकाल प्रकाशन यांच्या माध्यमातून हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत आणि आमदार पराग अळवणी उपस्थित होते. जगभरात ५५० हॉटेलचे जाळे उभारण्यामागे स्वामी विवेकानंदांचे विचार प्रेरणादायी असल्याची भावना विठ्ठल कामत यांनी व्यक्त केली. विवेकानंदांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत असेही ते म्हणाले, तर आजच्या पिढीने हे पुस्तक संग्रही बाळगावे असे कौतुकोग्दार आमदार पराग अळवणी यांनी काढले.
सर्वसमावेशक वेदांत तत्त्वज्ञानाची ध्वजा निर्भिडपणे फडकावणाऱ्या विवेकानंदांचे विचार समग्र पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी रंगकर्मी तुकाराम जाधव यांनी वयाच्या ७५व्या वर्षी ‘धीमंत योगी’ पुस्तकाचे संकलन व लेखन केले आहे. त्यांनी दीनानाथ नाट्यगृहाच्या स्थापनेपासून आजतागायत अखंडपणे रंगभूमीची अखंड सेवा केली आहे.
विवेकानंद यांना आवडणाऱ्या सरोद व तबवा यांच्या कलाकृती तयार करून त्या माध्यमातून या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यामध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीला बारपांडे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मंगेशकर कुटुंबीय, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, प्रशांत दामले, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, चौरंगचे अशोक हांडे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मश्री राव यांनी केले. हे पुस्तक जवाहर बुक डेपो येथे उपलब्ध आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणाला तोंड देऊनही जगभरात हिंदू धर्म घट्ट पाळेमुळे रोवून आहे. याचे श्रेय आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्या परिश्रमाला जाते, अशी कृतज्ञता प्रा. मोहन आपटे यांनी सोमवारी व्यक्त केली. स्वामी विवेकानंद यांच्यावरील तुकाराम जाधवलिखित ‘धीमंत योगी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले, श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि संधीकाल प्रकाशन यांच्या माध्यमातून हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत आणि आमदार पराग अळवणी उपस्थित होते. जगभरात ५५० हॉटेलचे जाळे उभारण्यामागे स्वामी विवेकानंदांचे विचार प्रेरणादायी असल्याची भावना विठ्ठल कामत यांनी व्यक्त केली. विवेकानंदांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत असेही ते म्हणाले, तर आजच्या पिढीने हे पुस्तक संग्रही बाळगावे असे कौतुकोग्दार आमदार पराग अळवणी यांनी काढले.
सर्वसमावेशक वेदांत तत्त्वज्ञानाची ध्वजा निर्भिडपणे फडकावणाऱ्या विवेकानंदांचे विचार समग्र पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी रंगकर्मी तुकाराम जाधव यांनी वयाच्या ७५व्या वर्षी ‘धीमंत योगी’ पुस्तकाचे संकलन व लेखन केले आहे. त्यांनी दीनानाथ नाट्यगृहाच्या स्थापनेपासून आजतागायत अखंडपणे रंगभूमीची अखंड सेवा केली आहे.
विवेकानंद यांना आवडणाऱ्या सरोद व तबवा यांच्या कलाकृती तयार करून त्या माध्यमातून या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यामध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीला बारपांडे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मंगेशकर कुटुंबीय, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, प्रशांत दामले, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, चौरंगचे अशोक हांडे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मश्री राव यांनी केले. हे पुस्तक जवाहर बुक डेपो येथे उपलब्ध आहे.