म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रवेश न घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
कोचिंग क्लास व ज्युनिअर कॉलेज एकत्रित असलेल्या म्हणजे इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करून अशा कॉलेजांवर अंकुश ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे येत्या काळात 'इंटिग्रेटेड'ची वाट अधिक बिकट होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
जेईई व नीट परीक्षा देऊ इच्छिणारे बहुतांश विद्यार्थी हे इंटिग्रेटेड ज्युनिअर कॉलेजांना जाणे पसंत करतात. यामध्ये या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले नाही तरी चालते त्यांची क्लासमधील उपस्थितीच कॉलजची उपस्थिती म्हणून ग्राह्य धरली जाते. यात अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होते व आयत्या वेळी त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागते. तसेच यामध्ये अनेक कॉलेजे अनधिकृत असल्यामुळेही विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असते. या सर्व व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवर पालक आणि विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड कॉलेजामध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच असे प्रवेश घेतले आणि भविष्यात काही फसवणूक झाली तर त्यास शिक्षण विभाग जबाबदार नसेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची जाहीर सूचना यंदा प्रथमच वेबसाइटवर देण्यात आली आहे. यामुळे यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी अधिक सजग व्हावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही
अशा कॉलेजांना चाप बसावा, यासाठी यंदापासून सर्व ज्युनिअर कॉलेजांना बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही लावणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय लवकरच येणार आहे. कॉलेजांना ही सर्व व्यवस्था उभी करण्यासाठी काही अवधी दिला जाईल, मात्र त्यानंतर सर्व ज्युनिअर कॉलेजांची तपासणीही केली जाईल असेही ते म्हणाले.
कॉलेजांच्या पर्यायांना सुरुवात
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेजांचे पर्याय भरण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेत यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी एक हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरून पूर्ण केला आहे.
प्रवेश न घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
कोचिंग क्लास व ज्युनिअर कॉलेज एकत्रित असलेल्या म्हणजे इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करून अशा कॉलेजांवर अंकुश ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे येत्या काळात 'इंटिग्रेटेड'ची वाट अधिक बिकट होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
जेईई व नीट परीक्षा देऊ इच्छिणारे बहुतांश विद्यार्थी हे इंटिग्रेटेड ज्युनिअर कॉलेजांना जाणे पसंत करतात. यामध्ये या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले नाही तरी चालते त्यांची क्लासमधील उपस्थितीच कॉलजची उपस्थिती म्हणून ग्राह्य धरली जाते. यात अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होते व आयत्या वेळी त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागते. तसेच यामध्ये अनेक कॉलेजे अनधिकृत असल्यामुळेही विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असते. या सर्व व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवर पालक आणि विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड कॉलेजामध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच असे प्रवेश घेतले आणि भविष्यात काही फसवणूक झाली तर त्यास शिक्षण विभाग जबाबदार नसेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची जाहीर सूचना यंदा प्रथमच वेबसाइटवर देण्यात आली आहे. यामुळे यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी अधिक सजग व्हावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही
अशा कॉलेजांना चाप बसावा, यासाठी यंदापासून सर्व ज्युनिअर कॉलेजांना बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही लावणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय लवकरच येणार आहे. कॉलेजांना ही सर्व व्यवस्था उभी करण्यासाठी काही अवधी दिला जाईल, मात्र त्यानंतर सर्व ज्युनिअर कॉलेजांची तपासणीही केली जाईल असेही ते म्हणाले.
कॉलेजांच्या पर्यायांना सुरुवात
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेजांचे पर्याय भरण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेत यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी एक हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरून पूर्ण केला आहे.