म.टा. प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या नात्याने आपुलकीने सर्वांशी सवांद साधतराज्यातील जनतेच्या पाठीशी उभे आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेचे काही अधिकारी जनतेशी अरेरावी करीत, उद्धट भाषा वापरत सरकार आणि पालिका प्रशासनाच्या कार्याला गालबोट लावत असल्याचा आरोपलेखक-दिग्दर्शक वीरेन प्रधान यांनी केला आहे. तर पालिका अधिकाऱ्यांनी मात्र, आम्ही योग्य नियमावलीनुसार कायद्याची अंमलबजावणी करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोरेगाव पी वॉर्डमधील सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या वीरेन प्रधान आणि त्यांची पत्नी ऋग्वेदी यांना टीव्ही मालिका चित्रीकरणाच्या कामासाठी दमणला जायचे होते. त्यासाठी त्यांनी नियमानुसार स्वतःची आरटी-पीसीआर चाचणी करून घेतली. यात प्रयोगशाळेतून वीरेन यांचा अहवाल निगेटिव्ह;तर ऋग्वेदी यांची करोनाचाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु, त्यांना करोनाची कोणतेही लक्षणे नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा दोन वेळा दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत चाचणी केली. या दोन्हीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वीरेन यांनी सांगितले. 'परंतु, दरम्यानच्या काही दिवसांत पालिका अधिकारी डॉ. नितीश ठाकुर यांनी आपल्याशी फोनवरून संवाद साधताना अरेरावीची भाषा केली. केवळ पहिलाच अवहवाल आम्ही ग्राह्य धरतो;असे त्यांनी सांगितले. सोबतच पोलिस प्रशासनाकडून आमच्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली. आमच्या फॅमिली डॉक्टरसोबत देखील उद्धटपणे संवाद साधला. ज्या प्रयोगशाळेतून पहिल्यांदा चुकीचा अहवाल आला होता. त्यांनाच पुन्हा चाचणीसाठी आमच्याकडे पाठविण्यात आले. आमच्या सोसायटीवर दबाव आणून आमचे घर सील करायला लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुरेश ककाणी आदी मंडळी जनतेशी सामंजस्याने संवाद साधत आहे. परंतु, काही अधिकाऱ्यांकमुळे पालिकेच्या कामाला गालबोट लागत आहे. परंतु, या सगळ्यात डॉ. ठाकुर यांच्या वागण्याने आम्हाला मानसिक त्रास झाला आहे,' असे प्रधान यांनी सांगितले. सोबतच त्यांच्या सोसायटीमधील काही महिन्यांपूर्वीच्या एका घटनेचा पूर्वग्रह ठेवून डॉ. ठाकुर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा अंदाज प्रधान यांना आहे. पालिका अधिकाऱ्यांनी जनतेशी सामंजस्याने आणि आपुलकीने वागण्याची मागणी प्रधान यांची केली आहे.
पालिका प्रशासन म्हणते...
'करोना संसर्गासंदर्भात पालिकने आखून दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. प्रयोगशाळेतून करोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यानुसार उपाय योजले जातात. त्यानुसार सगळे नियम पाळले गेले आहेत. गेल्या वर्षभरापासून आवश्यक ती सर्व पद्धत अवलंबली जात आहे. त्यामुळे कोणताही नियम मोडला गेलेला नसून, पालिकेच्या निर्देशानुसारच सगळी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.' असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या नात्याने आपुलकीने सर्वांशी सवांद साधतराज्यातील जनतेच्या पाठीशी उभे आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेचे काही अधिकारी जनतेशी अरेरावी करीत, उद्धट भाषा वापरत सरकार आणि पालिका प्रशासनाच्या कार्याला गालबोट लावत असल्याचा आरोपलेखक-दिग्दर्शक वीरेन प्रधान यांनी केला आहे. तर पालिका अधिकाऱ्यांनी मात्र, आम्ही योग्य नियमावलीनुसार कायद्याची अंमलबजावणी करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोरेगाव पी वॉर्डमधील सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या वीरेन प्रधान आणि त्यांची पत्नी ऋग्वेदी यांना टीव्ही मालिका चित्रीकरणाच्या कामासाठी दमणला जायचे होते. त्यासाठी त्यांनी नियमानुसार स्वतःची आरटी-पीसीआर चाचणी करून घेतली. यात प्रयोगशाळेतून वीरेन यांचा अहवाल निगेटिव्ह;तर ऋग्वेदी यांची करोनाचाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु, त्यांना करोनाची कोणतेही लक्षणे नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा दोन वेळा दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत चाचणी केली. या दोन्हीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वीरेन यांनी सांगितले. 'परंतु, दरम्यानच्या काही दिवसांत पालिका अधिकारी डॉ. नितीश ठाकुर यांनी आपल्याशी फोनवरून संवाद साधताना अरेरावीची भाषा केली. केवळ पहिलाच अवहवाल आम्ही ग्राह्य धरतो;असे त्यांनी सांगितले. सोबतच पोलिस प्रशासनाकडून आमच्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली. आमच्या फॅमिली डॉक्टरसोबत देखील उद्धटपणे संवाद साधला. ज्या प्रयोगशाळेतून पहिल्यांदा चुकीचा अहवाल आला होता. त्यांनाच पुन्हा चाचणीसाठी आमच्याकडे पाठविण्यात आले. आमच्या सोसायटीवर दबाव आणून आमचे घर सील करायला लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुरेश ककाणी आदी मंडळी जनतेशी सामंजस्याने संवाद साधत आहे. परंतु, काही अधिकाऱ्यांकमुळे पालिकेच्या कामाला गालबोट लागत आहे. परंतु, या सगळ्यात डॉ. ठाकुर यांच्या वागण्याने आम्हाला मानसिक त्रास झाला आहे,' असे प्रधान यांनी सांगितले. सोबतच त्यांच्या सोसायटीमधील काही महिन्यांपूर्वीच्या एका घटनेचा पूर्वग्रह ठेवून डॉ. ठाकुर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा अंदाज प्रधान यांना आहे. पालिका अधिकाऱ्यांनी जनतेशी सामंजस्याने आणि आपुलकीने वागण्याची मागणी प्रधान यांची केली आहे.
पालिका प्रशासन म्हणते...
'करोना संसर्गासंदर्भात पालिकने आखून दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. प्रयोगशाळेतून करोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यानुसार उपाय योजले जातात. त्यानुसार सगळे नियम पाळले गेले आहेत. गेल्या वर्षभरापासून आवश्यक ती सर्व पद्धत अवलंबली जात आहे. त्यामुळे कोणताही नियम मोडला गेलेला नसून, पालिकेच्या निर्देशानुसारच सगळी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.' असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.