अ‍ॅपशहर

'दिशा' कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणार: गृहमंत्री

आंध्र प्रदेश राज्यातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2020, 4:42 pm
मुंबई: करोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर "दिशा" कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh


हा कायदा करताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचारमंथन होणे गरजेचे आहे. यासाठी अध्यादेश न आणता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे व त्यापूर्वी बैठक घेऊन महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या जातील अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

आंध्रमधील ‘दिशा’च्या धर्तीवर कायदा
पोलिस व्हॅनसाठी फिरवा ११२ क्रमांक

बलात्काऱ्यांना फाशी?


आज महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांवर चाप लावण्याच्या दृष्टीने तसेच महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातला 'दिशा' कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच स्थगित करावे लागत असल्यामुळे या कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज