म. टा. प्रतिनिधी, मुंबई
यंदा दुष्काळाचे संकट मोठे असल्यामुळे दिवाळीचा सण साजरा न करण्याचा निर्णय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. परिणामी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुंडे यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी सलग दोन दिवस बीड जिल्ह्याच्या काही भागांना भेटी दिल्या असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश घोषणा केवळ कागदावरच असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
राज्यात सर्वाधिक दुष्काळाचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. 'या भागातील जनता दुष्काळात होरपळत असताना, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या परदेशातील दौऱ्यात मग्न आहेत. त्या परदेशातून उपग्रहाच्या माध्यमातून बीडच्या दुष्काळाची पाहणी करीत असाव्यात', असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. त्यामुळेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाची आढावा बैठक घेतात; पण बीड जिल्ह्याला टाळतात. यामागे पालकमंत्र्यांची संवेदनशीलता दिसते, असा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अंबाजोगाई तालुका दौऱ्यानंतर आज बुधवारी बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांचा पाण्याअभावी वाळून जाणाऱ्या ऊसाची तसेच कापसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 'यंदाचा दुष्काळ सन १९७२पेक्षा भयानक आहे. सरकारने १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असले तरी, शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दुधदुभत्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या जनावरांना चारा नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे', असे मुंडे यांचे म्हणणे आहे.
गतवर्षीच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी सरकारने भलीमोठी घोषणा केली. प्रत्यक्षात केवळ ६०० रुपये ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत, वीज बिलात संपूर्ण माफी, दावणीला चारा आणि तातडीने टँकर सुरू केल्याशिवाय आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.
यंदा दुष्काळाचे संकट मोठे असल्यामुळे दिवाळीचा सण साजरा न करण्याचा निर्णय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. परिणामी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुंडे यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी सलग दोन दिवस बीड जिल्ह्याच्या काही भागांना भेटी दिल्या असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश घोषणा केवळ कागदावरच असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
राज्यात सर्वाधिक दुष्काळाचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. 'या भागातील जनता दुष्काळात होरपळत असताना, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या परदेशातील दौऱ्यात मग्न आहेत. त्या परदेशातून उपग्रहाच्या माध्यमातून बीडच्या दुष्काळाची पाहणी करीत असाव्यात', असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. त्यामुळेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाची आढावा बैठक घेतात; पण बीड जिल्ह्याला टाळतात. यामागे पालकमंत्र्यांची संवेदनशीलता दिसते, असा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अंबाजोगाई तालुका दौऱ्यानंतर आज बुधवारी बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांचा पाण्याअभावी वाळून जाणाऱ्या ऊसाची तसेच कापसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 'यंदाचा दुष्काळ सन १९७२पेक्षा भयानक आहे. सरकारने १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असले तरी, शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दुधदुभत्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या जनावरांना चारा नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे', असे मुंडे यांचे म्हणणे आहे.
गतवर्षीच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी सरकारने भलीमोठी घोषणा केली. प्रत्यक्षात केवळ ६०० रुपये ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत, वीज बिलात संपूर्ण माफी, दावणीला चारा आणि तातडीने टँकर सुरू केल्याशिवाय आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.