म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेची राजकीय भूमिका काय असावी, यात लुडबड करण्याचे कारण नाही. भाजपमध्ये काय चालले आहे ते आधी चंद्रकांत पाटील यांनी पाहावे असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी हाणला आहे.
शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी ताबडतोब भाजपशी युती करावी. काँग्रेसला फायदा होईल असे शिवसेनेने वर्तन करता कामा नये, अशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुक्ताफळे आम्हांला मान्य नाहीत. आगामी निवडणुकांसाठी संभाव्य युतीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आणि सक्षम आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याची गरज नाही, असे कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटील यांनी शिवसेनेला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. ते शिवसेना चालवत नाहीत. भाजपला शिवसेनेबरोबर युती करायचीच होती तर गेल्या चार वर्षांत भाजपने ही भूमिका का मांडली नाही? आताच शिवसेनेची कशासाठी आठवण आली आहे? अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला जनहिताच्या कामासाठी भेटण्याचे टाळले आहे, असा आरोपही कदम यांनी केला. अनेक धोरणात्मक बाबी व महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतही शिवसेनेला डावलण्याची भूमिका घेतली जाते. त्यावेळी त्यांना शिवसेना का आठवत नाही, असा रोकडा सवालही कदम यांनी केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेची राजकीय भूमिका काय असावी, यात लुडबड करण्याचे कारण नाही. भाजपमध्ये काय चालले आहे ते आधी चंद्रकांत पाटील यांनी पाहावे असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी हाणला आहे.
शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी ताबडतोब भाजपशी युती करावी. काँग्रेसला फायदा होईल असे शिवसेनेने वर्तन करता कामा नये, अशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुक्ताफळे आम्हांला मान्य नाहीत. आगामी निवडणुकांसाठी संभाव्य युतीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आणि सक्षम आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याची गरज नाही, असे कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटील यांनी शिवसेनेला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. ते शिवसेना चालवत नाहीत. भाजपला शिवसेनेबरोबर युती करायचीच होती तर गेल्या चार वर्षांत भाजपने ही भूमिका का मांडली नाही? आताच शिवसेनेची कशासाठी आठवण आली आहे? अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला जनहिताच्या कामासाठी भेटण्याचे टाळले आहे, असा आरोपही कदम यांनी केला. अनेक धोरणात्मक बाबी व महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतही शिवसेनेला डावलण्याची भूमिका घेतली जाते. त्यावेळी त्यांना शिवसेना का आठवत नाही, असा रोकडा सवालही कदम यांनी केला आहे.