मिरवणुका ‘डीजे’विनाच!
'सण-उत्सव एकापाठोपाठ येतच असतात, पण त्यातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही. आवाजाच्या पातळीविषयी तुम्ही लेखी हमी जरी दिली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर डीजे व साऊंड सिस्टीमच्या आवाजाची पातळी किती असते.
Maharashtra Times 15 Sep 2018, 2:22 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'सण-उत्सव एकापाठोपाठ येतच असतात, पण त्यातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही. आवाजाच्या पातळीविषयी तुम्ही लेखी हमी जरी दिली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर डीजे व साऊंड सिस्टीमच्या आवाजाची पातळी किती असते, हे आम्हाला ठाऊक आहे', असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने डीजे व कर्णकर्कश साऊंड सिस्टीमच्या वापराला परवानगी देण्यास तूर्त नकार दिला आहे. याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगून पुढील सुनावणी बुधवारी, १९ सप्टेंबरला ठेवल्याने सोमवार, १७ सप्टेंबरला होणाऱ्या गौरी-गणपती विसर्जन मिरवणुका 'डीजे'विनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट, २०१६मध्ये दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळातील विसर्जन मिरवणुकांमधील डीजेच्या दणदणाटाचा प्रश्न उभा राहिल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे व साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत सील करण्याची कारवाई केली. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या 'प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशन'ने (पाला) ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. शुक्रवारी हा विषय पुन्हा सुनावणीस आला असता, प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडण्यासाठी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी चार दिवसांचा अवधी मागितला. याचिकाकर्त्यांचेही म्हणणे ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली. (धाडणार न्यायमूर्तींना पत्र...१०)
'सण-उत्सव एकापाठोपाठ येतच असतात, पण त्यातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही. आवाजाच्या पातळीविषयी तुम्ही लेखी हमी जरी दिली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर डीजे व साऊंड सिस्टीमच्या आवाजाची पातळी किती असते, हे आम्हाला ठाऊक आहे', असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने डीजे व कर्णकर्कश साऊंड सिस्टीमच्या वापराला परवानगी देण्यास तूर्त नकार दिला आहे. याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगून पुढील सुनावणी बुधवारी, १९ सप्टेंबरला ठेवल्याने सोमवार, १७ सप्टेंबरला होणाऱ्या गौरी-गणपती विसर्जन मिरवणुका 'डीजे'विनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट, २०१६मध्ये दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळातील विसर्जन मिरवणुकांमधील डीजेच्या दणदणाटाचा प्रश्न उभा राहिल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे व साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत सील करण्याची कारवाई केली. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या 'प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशन'ने (पाला) ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. शुक्रवारी हा विषय पुन्हा सुनावणीस आला असता, प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडण्यासाठी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी चार दिवसांचा अवधी मागितला. याचिकाकर्त्यांचेही म्हणणे ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली. (धाडणार न्यायमूर्तींना पत्र...१०)