म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे शेतकरी आणि विविध घटक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे ११वे वर्ष आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन दूरदर्शनने केले आहे.
जलव्यवस्थापन, कृषी, कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम, ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, फळे, फुलशेती आणि भाजीपाला, सामाजिक वनीकरण, कृषी पूरक उद्योग (रेशीम, मधमाशीपालन, गांडूळशेती, कुक्कुटपालन, वराहपालन, शेळीपालन, कृषिपर्यटन क्षेत्र), कृषी विस्तार क्षेत्र, पणन व्यवस्था आणि कृषी विस्तार कार्य करणारी संस्था आदी घटक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी उल्लेखनीय कार्याच्या तपशिलाचा प्रस्ताव दोन ते तीन पानांत संबंधित कृषी विद्यापीठ आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांकडे पाठवायचे आहेत. प्रस्ताव कुलगुरूंच्या नावे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी, जिल्हा अहमदनगर), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली, जिल्हा रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) या विद्यापीठांकडे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठवायचे आहेत. १९ मार्च २०१८पर्यंत प्रस्ताव पाठवावे. तसेच www.ddsahyadri.in या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या कार्यक्रम सहायक संचालिका डॉ. श्रीवास्तव यांनी दिली.
कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे शेतकरी आणि विविध घटक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे ११वे वर्ष आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन दूरदर्शनने केले आहे.
जलव्यवस्थापन, कृषी, कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम, ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, फळे, फुलशेती आणि भाजीपाला, सामाजिक वनीकरण, कृषी पूरक उद्योग (रेशीम, मधमाशीपालन, गांडूळशेती, कुक्कुटपालन, वराहपालन, शेळीपालन, कृषिपर्यटन क्षेत्र), कृषी विस्तार क्षेत्र, पणन व्यवस्था आणि कृषी विस्तार कार्य करणारी संस्था आदी घटक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी उल्लेखनीय कार्याच्या तपशिलाचा प्रस्ताव दोन ते तीन पानांत संबंधित कृषी विद्यापीठ आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांकडे पाठवायचे आहेत. प्रस्ताव कुलगुरूंच्या नावे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी, जिल्हा अहमदनगर), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली, जिल्हा रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) या विद्यापीठांकडे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठवायचे आहेत. १९ मार्च २०१८पर्यंत प्रस्ताव पाठवावे. तसेच www.ddsahyadri.in या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या कार्यक्रम सहायक संचालिका डॉ. श्रीवास्तव यांनी दिली.