मुंबई: दरवर्षी लाखो लोकांचे बळी घेणारा मलेरिया आजार आणखी उग्र रुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'द लँसेट' नामक एका पत्रिकेत प्रकाशित झालेल्या लेखानुसार, दक्षिण-पूर्व आशियामध्ये सुमारे ८० टक्के मलेरियाच्या जंतूंनी औषधांचा सामना करण्याची क्षमता विकसित केली आहे. या जंतूंनी कंबोडिया, लाओस आणि थायलंड ते व्हिएतनामपर्यंत आपले साम्राज्य पसरले आहे. मलेरियाच्या अर्ध्या रुग्णांसाठी आर्टिमीसिनिन आणि पिपॅरॅक्विन ही औषधे निप्रभ ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
माणसांमध्ये मलेरियाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्वात घातक प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम या जंतूपुढे औषधांचे कुचकामी ठरणे हे हा आजार रोखण्याच्या मार्गातील सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. या जंतूमुळे मलेरियाच्या १० पैकी ९ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विषयाशी संबंधित झालेल्या संशोधनानुसार, औषधांना दाद न देणारा प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम हा जंतू इतर स्थानिक जंतूंची संख्या कमी करून स्वत: वाढत आहे. यामुळे मलेरियावर उपचार करणे अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.
उपचार शक्य आहे की नाही?
मात्र, या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या लेखात मलेरियावरील उपचार शक्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, औषधांना प्रतिरोध करण्याच्या जंतूच्या क्षमतेमुळे रुग्णांना आर्टिमीसिनिन आणि पिपेरॅक्विनव्यतिरिक्त इतरही औषधे देण्याची आवश्यकता असल्याचे लेखात म्हटले आहे.
जंतूंमध्ये निर्माण झालेल्या औषधे निष्प्रक्ष करण्याच्या क्षमतेमुळे लवकरच मलेरियाच्या औषधांमध्ये बदल करणे गरचेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
माणसांमध्ये मलेरियाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्वात घातक प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम या जंतूपुढे औषधांचे कुचकामी ठरणे हे हा आजार रोखण्याच्या मार्गातील सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. या जंतूमुळे मलेरियाच्या १० पैकी ९ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विषयाशी संबंधित झालेल्या संशोधनानुसार, औषधांना दाद न देणारा प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम हा जंतू इतर स्थानिक जंतूंची संख्या कमी करून स्वत: वाढत आहे. यामुळे मलेरियावर उपचार करणे अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.
उपचार शक्य आहे की नाही?
मात्र, या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या लेखात मलेरियावरील उपचार शक्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, औषधांना प्रतिरोध करण्याच्या जंतूच्या क्षमतेमुळे रुग्णांना आर्टिमीसिनिन आणि पिपेरॅक्विनव्यतिरिक्त इतरही औषधे देण्याची आवश्यकता असल्याचे लेखात म्हटले आहे.
जंतूंमध्ये निर्माण झालेल्या औषधे निष्प्रक्ष करण्याच्या क्षमतेमुळे लवकरच मलेरियाच्या औषधांमध्ये बदल करणे गरचेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.