अ‍ॅपशहर

‘कर्जफेडीचे प्रयत्न ‘ईडी’ने उधळवले’

मुंबई : अनेक बँकांची नऊ हजार कोटींहून अधिकची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेल्याचा आरोप असलेला उद्योगपती विजय मल्ल्याने 'मी अनिवासी भारतीय आहे, त्यामुळे मी देशाबाहेर पळून गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे', असा दावा सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात केला. त्याचप्रमाणे 'सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यासाठी मी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालवले असताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मात्र ते उधळवून लावले', असा दावाही त्याने केला.

Maharashtra Times 25 Sep 2018, 4:07 am
मुंबई : अनेक बँकांची नऊ हजार कोटींहून अधिकची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेल्याचा आरोप असलेला उद्योगपती विजय मल्ल्याने 'मी अनिवासी भारतीय आहे, त्यामुळे मी देशाबाहेर पळून गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे', असा दावा सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात केला. त्याचप्रमाणे 'सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यासाठी मी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालवले असताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मात्र ते उधळवून लावले', असा दावाही त्याने केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mallya1


आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पलायन करणाऱ्या आरोपींना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नवा कायदा केला आहे. त्याअंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया टाळणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून 'परागंदा आर्थिक गुन्हेगार' घोषित करण्यात आल्यानंतर त्यांची संपत्ती तात्काळ जप्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, 'ईडी'ने मल्ल्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करून त्याला परागंदा आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. याविषयी न्या. एम. एस. आझमी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या मल्ल्याने आपल्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज