मुंबई: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी, २२ ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातून राज यांना ईडीची नोटीस पाठवली आहे. याविरोधात रस्त्यावर उतरणार असून, २२ ऑगस्टलाच ठाण्यात बंद पाळण्यात येईल, असा इशारा मनसेनं दिला.
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरेंना ईडीनं येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं आहे. यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. २२ तारखेलाच ठाण्यात बंद पाळण्यात येईल. त्या दिवशी जे घडेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे कुणालाही भीक घालत नाहीत, ते ईडीच्या नोटिशीलाही भीक घालणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह सर्वच विरोधी पक्ष राज यांच्या पाठिशी आहेत, असं त्या म्हणाल्या. देशात ईव्हीएमचे सरकार आहे. ईव्हीएमविरोधात सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळं राज यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात भाजपची सत्ता आहे. आता राज्यातही त्यांना सत्ता हवी आहे. ईव्हीएमविरोधात राज हे सर्वपक्षीयांना एकत्र आणून मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा काढू द्यायचा नसून, सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे, असंही चव्हाण म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
कोहिनूर प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस
राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही दडपशाहीः थोरात
ED: उद्योगात उतरलं की हे आलंच- मनोहर जोशी
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरेंना ईडीनं येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं आहे. यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. २२ तारखेलाच ठाण्यात बंद पाळण्यात येईल. त्या दिवशी जे घडेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे कुणालाही भीक घालत नाहीत, ते ईडीच्या नोटिशीलाही भीक घालणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह सर्वच विरोधी पक्ष राज यांच्या पाठिशी आहेत, असं त्या म्हणाल्या. देशात ईव्हीएमचे सरकार आहे. ईव्हीएमविरोधात सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळं राज यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात भाजपची सत्ता आहे. आता राज्यातही त्यांना सत्ता हवी आहे. ईव्हीएमविरोधात राज हे सर्वपक्षीयांना एकत्र आणून मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा काढू द्यायचा नसून, सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे, असंही चव्हाण म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
कोहिनूर प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस
राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही दडपशाहीः थोरात
ED: उद्योगात उतरलं की हे आलंच- मनोहर जोशी