दीडशे मुलींना योजनेतून मदत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक होतकरू मुलींना शिक्षण घेता येत नाही. अंगी गुणवत्ता असूनही शिक्षणापासून दूर राहिलेल्या दीडशे मुलींचे शैक्षणिक पालकत्व यंदा मुंबईकरांनी घेतले आहे.
मुलींना शालेय शिक्षणासह कॉलेजच्या शिक्षणासाठीही शैक्षणिक पालकत्व योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. मुंबईतल्या स्वाधार या संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम मुंबईमध्ये राबवण्यात येतो. स्वाधार सामाजिक संस्थेमध्ये कायदेविषयक अडचणींसह इतर कौंटुबिक समस्यांसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गरीब कुटुंबातील महिला येतात. या महिला मुंबईकरांच्या घरांमध्ये कष्टाची कामे करणाऱ्या असतात. आई कामाला गेली की मागे भावंडांना सांभाळायला कोण, या विचाराने मुलींचे शिक्षण तुटते. अनेकदा पैसेही नसतात. त्यामुळेही शाळेचा पर्याय निवडता येत नाही. या महिलांशी चर्चा केल्यानंतर मुलींना शाळा शिकायची इच्छा असल्याचे लक्षात आल्यावर स्वाधारने ही योजना सुरू केली. त्यात मुंबईकरांनीही मोठ्या मनाने पुढाकार घेत दातृत्वाची प्रचिती दिली. ही आर्थिक मदत या मुलींना थेट हातात दिली जात नाही तर त्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके, कंपासपेट्या, गणवेशासह विशेष मार्गदर्शनासाठी लावण्यात येणाऱ्या वर्गांचे शुल्कही दिले जाते. मुलींसाठी आरोग्यशिबिरे घेतली जातात. विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना बोलते केले जाते, त्यांच्यातील नेतृत्वविकास गुणही विकसित केले जातात, शाळा संपल्यानंतर या मुलींच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर राहावा यासाठी हे शैक्षणिक पालकत्व घेतलेले पालक आवर्जून संपर्कात राहतात. परीक्षांचे निकाल लागल्यानंतर या पालकांच्या हस्तेच मुलींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येतो.
मृणालताई गोरे यांच्या पुढाकाराने ही योजना स्वाधारमध्ये सुरू झाल्याचे अध्यक्षा लता कारखानीस यांनी सांगितले. ही योजना सुरू झाली तेव्हा अवघ्या २५ मुली होत्या, आज ही संख्या वाढत जाऊन दीडशे झाली आहे. मदत देण्यात येणाऱ्या मुलींची शिकण्याची प्रामाणिक कळकळ ओळखून त्यानंतरच ही मदत दिली जाते. मराठी माध्यमाच्या शाळांतील गरजू मुलींना ही मदत देण्यासाठी पुढे येणाऱ्या मुंबईकरांची संख्याही वाढते आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्या सांगतात.
मुली झाल्या आत्मनिर्भर
केवळ दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन या मुली थांबत नाही तर विविध प्रकारचे कोर्सेस करण्यावर त्यांचा आता भर असतो. करिअरच्या नवनवीन दिशा त्या धुंडाळतात. आज यातल्या काही मुली शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर एकीने सीएच्या अंतिम परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मिळालेल्या मदतीचे ऋणही या मुलींच्या मनात आहेच. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची गरज असतेच, पण मुलीच्या शिक्षणाकडे विशेषत्वाने दुर्लक्ष होते, त्यामुळे मुलींच्या विकासासाठी शिक्षण, करिअर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हेसुद्धा या माध्यमातून समाजाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला जातो, अशीही यामागील स्वाधारची भूमिका आहे.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक होतकरू मुलींना शिक्षण घेता येत नाही. अंगी गुणवत्ता असूनही शिक्षणापासून दूर राहिलेल्या दीडशे मुलींचे शैक्षणिक पालकत्व यंदा मुंबईकरांनी घेतले आहे.
मुलींना शालेय शिक्षणासह कॉलेजच्या शिक्षणासाठीही शैक्षणिक पालकत्व योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. मुंबईतल्या स्वाधार या संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम मुंबईमध्ये राबवण्यात येतो. स्वाधार सामाजिक संस्थेमध्ये कायदेविषयक अडचणींसह इतर कौंटुबिक समस्यांसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गरीब कुटुंबातील महिला येतात. या महिला मुंबईकरांच्या घरांमध्ये कष्टाची कामे करणाऱ्या असतात. आई कामाला गेली की मागे भावंडांना सांभाळायला कोण, या विचाराने मुलींचे शिक्षण तुटते. अनेकदा पैसेही नसतात. त्यामुळेही शाळेचा पर्याय निवडता येत नाही. या महिलांशी चर्चा केल्यानंतर मुलींना शाळा शिकायची इच्छा असल्याचे लक्षात आल्यावर स्वाधारने ही योजना सुरू केली. त्यात मुंबईकरांनीही मोठ्या मनाने पुढाकार घेत दातृत्वाची प्रचिती दिली. ही आर्थिक मदत या मुलींना थेट हातात दिली जात नाही तर त्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके, कंपासपेट्या, गणवेशासह विशेष मार्गदर्शनासाठी लावण्यात येणाऱ्या वर्गांचे शुल्कही दिले जाते. मुलींसाठी आरोग्यशिबिरे घेतली जातात. विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना बोलते केले जाते, त्यांच्यातील नेतृत्वविकास गुणही विकसित केले जातात, शाळा संपल्यानंतर या मुलींच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर राहावा यासाठी हे शैक्षणिक पालकत्व घेतलेले पालक आवर्जून संपर्कात राहतात. परीक्षांचे निकाल लागल्यानंतर या पालकांच्या हस्तेच मुलींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येतो.
मृणालताई गोरे यांच्या पुढाकाराने ही योजना स्वाधारमध्ये सुरू झाल्याचे अध्यक्षा लता कारखानीस यांनी सांगितले. ही योजना सुरू झाली तेव्हा अवघ्या २५ मुली होत्या, आज ही संख्या वाढत जाऊन दीडशे झाली आहे. मदत देण्यात येणाऱ्या मुलींची शिकण्याची प्रामाणिक कळकळ ओळखून त्यानंतरच ही मदत दिली जाते. मराठी माध्यमाच्या शाळांतील गरजू मुलींना ही मदत देण्यासाठी पुढे येणाऱ्या मुंबईकरांची संख्याही वाढते आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्या सांगतात.
मुली झाल्या आत्मनिर्भर
केवळ दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन या मुली थांबत नाही तर विविध प्रकारचे कोर्सेस करण्यावर त्यांचा आता भर असतो. करिअरच्या नवनवीन दिशा त्या धुंडाळतात. आज यातल्या काही मुली शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर एकीने सीएच्या अंतिम परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मिळालेल्या मदतीचे ऋणही या मुलींच्या मनात आहेच. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची गरज असतेच, पण मुलीच्या शिक्षणाकडे विशेषत्वाने दुर्लक्ष होते, त्यामुळे मुलींच्या विकासासाठी शिक्षण, करिअर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हेसुद्धा या माध्यमातून समाजाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला जातो, अशीही यामागील स्वाधारची भूमिका आहे.