अ‍ॅपशहर

विजयानंतर एकनाथ खडसे भावूक, पवारांचे आभार मानले तर भाजपला मात्र खणखणीत इशारा

मोठ्या प्रतिक्षेनंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं विधिमंडळात पुनरागमन झालं आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या एकनाथ खडसे यांचा वनवास अखेर संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २८ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर त्यांचा आवाज पुन्हा विधिमंडळात घुमणार आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2022, 10:51 pm
मुंबई : "भाजपमधील माझ्या मित्रांनी मतदान केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी माझा विजय झाला. राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचं मी सोनं करेन. भाजपमध्ये माझा छळ झाला. त्यावेळी मला राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं. पण आता मला बोलायला व्यासपीठ आहे आणि संधीही आहे", अशी विजयी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी एकप्रकारे भाजपला इशारा दिला. यावेळी खडसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath khadse first reaction after won vidhan parishad mlc election 2022
एकनाथ खडसे


मोठ्या प्रतिक्षेनंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं विधिमंडळात पुनरागमन झालं आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या एकनाथ खडसे यांचा वनवास अखेर संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २८ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर त्यांचा आवाज पुन्हा विधिमंडळात घुमणार आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

"भाजपमध्ये असताना माझ्यावर स्वकियांनीच आरोपांच्या फैरी झाडल्या. माझे दाऊदबरोबर संबंध दाखवले गेले, माझ्या जावयावर आरोप झाले. मला बेघर करण्याचे प्रयत्न झाले. मला राजीनामा देण्यास भाग पाडले. आताही विधान परिषदेत निवडून न येण्यासाठी तसेच मला रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले. पण शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांनी मतांचं पक्क नियोजन केलं. भाजपमधल्या माझ्या मित्रांनी मला साथ दिली. त्यांचे आभार मी आभार मानतो"

"गेल्या सहा वर्षापासून राजकीय जीवनात टार्गेट केलं गेलं. मंत्रिपदावर असताना माझ्यावर आरोप केले गेले. पण माझ्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. दरम्यानच्या काळात खूप त्रास झाला. नंतरच्या काळात ईडीची चौकशी सुरु केली. मला बेघर करण्याचा प्रयत्न झाले. राजकीय व्हिजनवासात जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीने मला मदतीचा हात दिला. पवारसाहेबांनी तिकीट देऊन माझं राजकीय पुर्नवसन केलं. पक्षातील सगळ्या नेत्यांचे आभार मानतो.आता प्लॅटफॉर्म मिळालाय. सारे विषय योग्य वेळी काढेन. पक्षाचा विस्तार करण्यासाठी अनुभव पणाला लावेन."
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज