मुंबई: राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने सध्या मोठा वाद पेटला आहे. आज सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा असल्याने सकाळपासूनच अब्दुल सत्तार यांचे नाव चर्चेत होते. श्रीकांत शिंदे यांच्या सभेच्यानिमित्ताने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोडमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करून प्रकाशझोतात येण्याची संधी होती. मात्र, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सर्व वातावरणच पालटले आहे. त्यामुळे काहीवेळापूर्वी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता तोंड लपवायची वेळ आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण १२ वाजता सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात राजकीय वणवा पेटवला. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यानंतर याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात विविध ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार निर्दशने करण्यात आली. अवघ्या काही तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात वातावरण अक्षरश: तापवले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर जाऊन धडकले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. त्यामुळे वक्तव्य केल्यानंतर चार तासांनंतर अब्दुल सत्तार यांनी थातुमातूर कारणे देत, मूळ मुद्द्याला बगल देत का होईना, पण मी माझे वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा केली.
अब्दुल सत्तार यांनी केलेला हा सेल्फ गोल सिल्लोडमध्ये असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेत, 'अब्दुल सत्तार यांच्यासारखी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का, असे लोक मंत्री म्हणून चालणार आहेत का', असा सवाल विचारत शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
शिंदे गटाच्या मंत्र्यांने हात झटकले
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन वणवा पसरत जातो तसे राज्यभरात पसरत गेले. या राजकीय वणव्याची धग वाढतात शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही या वादापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर उदय सामंत यांनी म्हटले की, मला याप्रकरणाची संपूर्ण माहिती नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण आमचे मंत्रीमहोदय अब्दुल सत्तार यांनी एखादे चुकीचे वक्तव्य केले असेल तर ती गोष्ट योग्य नाही, असे सांगत उदय सामंत यांनी काढता पाय घेतला.
अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
मी कोणत्याही भगिनीबाबत अपशब्द बोललेलो नाही. मी जे बोललो, ते मला जे लोक बदनाम करतात त्यांच्याविषयी होते. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या वक्तव्य करताना मी कोणत्याही महिलेचे मन दुखावेल, असा शब्द बोललोच नाही. पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते खोक्यांबद्दल बोललोत, पण मी महिलांबद्दल बोललो असा अर्थ काढण्यात आला, अशी सारवासारव अब्दुल सत्तार यांनी केली.
अब्दुल सत्तार यांनी केलेला हा सेल्फ गोल सिल्लोडमध्ये असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेत, 'अब्दुल सत्तार यांच्यासारखी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का, असे लोक मंत्री म्हणून चालणार आहेत का', असा सवाल विचारत शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
शिंदे गटाच्या मंत्र्यांने हात झटकले
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन वणवा पसरत जातो तसे राज्यभरात पसरत गेले. या राजकीय वणव्याची धग वाढतात शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही या वादापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर उदय सामंत यांनी म्हटले की, मला याप्रकरणाची संपूर्ण माहिती नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण आमचे मंत्रीमहोदय अब्दुल सत्तार यांनी एखादे चुकीचे वक्तव्य केले असेल तर ती गोष्ट योग्य नाही, असे सांगत उदय सामंत यांनी काढता पाय घेतला.
अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
मी कोणत्याही भगिनीबाबत अपशब्द बोललेलो नाही. मी जे बोललो, ते मला जे लोक बदनाम करतात त्यांच्याविषयी होते. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या वक्तव्य करताना मी कोणत्याही महिलेचे मन दुखावेल, असा शब्द बोललोच नाही. पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते खोक्यांबद्दल बोललोत, पण मी महिलांबद्दल बोललो असा अर्थ काढण्यात आला, अशी सारवासारव अब्दुल सत्तार यांनी केली.