मुंबई : भाजप आमदारांच्या संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद घेऊ शकले असते पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. ते उमद्या मनाचे आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचे खूप खूप आभार, अशी विजयी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांइतका मोठ्या मनाचा माणूस पाहिला नाही. मुख्यमंत्रिपद दुसऱ्याला देण्याचा उदारपणा दुर्मिळ आहे. फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार. मजबूत सरकार महाराष्ट्राला दिसेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, आज संध्याकाळी साडे सात वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली. एकनाथ शिंदे यांनी दुपारी १ वाजता मुंबईत पाऊल ठेवलं. सागर निवासस्थानी जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांची भेट घेतली. तिथून सगळे तेथे राजभवनावर गेले. राज्यपालांची भेट घेऊन फडणवीस-शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
स्वत:कडे १२० आमदारांचा पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ आहेत. फडणवीस मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. फडणवीसांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मोदी-शहा-फडणवीसांचे खूप खूप आभार मानतो. आजची घटना ही ऐतिसाहिक घटना आहे. महाराष्ट्राला मजबूत सरकार दिसेल. आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"५० आमदार वेगळी भूमिका घेतात म्हणजे आत्मपरिक्षणाची गरज आहे. मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या कानावर जनतेचा रोष घातला होता. आमच्या समस्या त्यांच्या कानावर वारंवार टाकत होतो. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण असो आज बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री होतो आहे. महाराष्ट्राला स्थिर आणि मजबूत सरकार देऊ", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार. मजबूत सरकार महाराष्ट्राला दिसेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
स्वत:कडे १२० आमदारांचा पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ आहेत. फडणवीस मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. फडणवीसांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मोदी-शहा-फडणवीसांचे खूप खूप आभार मानतो. आजची घटना ही ऐतिसाहिक घटना आहे. महाराष्ट्राला मजबूत सरकार दिसेल. आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"५० आमदार वेगळी भूमिका घेतात म्हणजे आत्मपरिक्षणाची गरज आहे. मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या कानावर जनतेचा रोष घातला होता. आमच्या समस्या त्यांच्या कानावर वारंवार टाकत होतो. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण असो आज बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री होतो आहे. महाराष्ट्राला स्थिर आणि मजबूत सरकार देऊ", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.