अ‍ॅपशहर

'रेल्वे अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा'

रेल्वे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळेच परळ-एल्फिस्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाश्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra Times 30 Sep 2017, 2:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम elphinstone stampedepil filed in hc to book railway officials
'रेल्वे अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा'


रेल्वे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळेच परळ-एल्फिस्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाश्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तिने ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. भालेकर यांचे वकील नितीन सातपुते यांनी शुक्रवारी ही याचिका दाखल केल्याचं सांगितलं. याचिकेवर ३ ऑक्टोबरची तारीख टाकण्यात आल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि न्यायालयाने स्वत: या चौकशीवर लक्ष ठेवावे, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. हा पूल अत्यंत अरूंद असून त्यामुळे लोकांना ये-जा करण्यात प्रचंड अडचणी येत असतात. हे माहित असतानाही सरकार आणि रेल्वे प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही, असं याचिकेत नमूद केलं आहे.

भादंवि कलम ३०४ (२) नुसार कालच्या दुर्देवी दुर्घटनेतून रेल्वेचा पूर्णपणे हलगर्जीपणा दिसून येतो. पुन्हा एकदा सरकार आणि रेल्वे कार्यावाही करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याशिवाय पुलावर होत असलेल्या अतिक्रमणाविरोधातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज