म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी मान्सून दाखल झाला, मात्र मुंबईमध्ये उघडीप होती. जोरदार पाऊस पडेल या भीतीने दबकत घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी हुश्श केले, तरी सुखद पावसाच्या आगमनाची त्यांची ओढ कायम राहिली.
सहा ते नऊ जून दरम्यान जोरदार पावसाचा इशारा स्कायमेटने दिला होता. पावसाने हजेरी लावली नसली तरीही आज, शनिवारी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पालिका तसेच संबंधित यंत्रणा सुसज्ज आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या वीकेण्डला मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये मुंबईकरांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. ८ ते १२ जून दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. यासंदर्भात सूचना देणारे पत्रक हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
मंगळवारी आणि गुरुवारी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. या सरी मान्सूनपूर्व असल्याचे हवामान विभागाने सांगितले. ८ ते १२ जूनपर्यंत पावसाचा वेग वाढेल, असा अंदाज वर्तवला असताना शुक्रवारी मात्र उघडीप दिसली. शुक्रवारी मुंबईत कमाल तापमानाची सरासरी ३३ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली, तर शहरात पावसाची नोंद ०.६ मिमी करण्यात आली. शुक्रवारपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. वीकेण्डच्या या दोन दिवसांत दक्षिण कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रालाही आज, शनिवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये आल्यावर थोडा रेंगाळलेला मान्सून गोव्यापाठोपाठ शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणानंतर येत्या २४ तासांत मान्सून मुंबईमध्ये येणार आहे. हवामानातील अनुकूल बदलांमुळे मध्य अरबी समुद्राचा अजून काही भाग, कर्नाटक किनारपट्टीचा उर्वरित भाग आणि गोव्याहून पुढे सरकत मान्सूनने शुक्रवारी कोकण मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले होतेच, यात मान्सूनच्या आगमनामुळे सगळेच जण सुखावले. या भागात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पाऊस जोरदार बरसला. पुढील २४ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रातही कोल्हापूर, महाबळेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावली. कोकणात रत्नागिरीमध्ये २९ मिमी आणि पणजीत ४८ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस कोकणात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी अतीतीव्र स्वरुपाच्या सरी उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात कोसळू शकतात. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. पावसाचा हा प्रभाव १२ जूनपर्यंत असेल. मात्र ९ ते ११ दरम्यान पावसाच्या सरींची तीव्रता सर्वाधिक असेल, असे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामध्ये नमूद केले आहे.
गुरुवारी पडला सर्वाधिक पाऊस
गुरुवारी झालेल्या पावसाच्या नोंदीत सर्वाधिक पावसाची नोंद बीकेसी येथे (७५ मिमी) झाली आहे. तर, दादर येथे ५८ मिमी, वांद्रे पश्चिमेला ५५ मिमी पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. ३५ ते ४५ मिमीच्या नोंदीमध्ये गोरेगाव, वरळी कॉलनी, सांताक्रूझ, अंधेरी हा परिसर होता.
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी मान्सून दाखल झाला, मात्र मुंबईमध्ये उघडीप होती. जोरदार पाऊस पडेल या भीतीने दबकत घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी हुश्श केले, तरी सुखद पावसाच्या आगमनाची त्यांची ओढ कायम राहिली.
सहा ते नऊ जून दरम्यान जोरदार पावसाचा इशारा स्कायमेटने दिला होता. पावसाने हजेरी लावली नसली तरीही आज, शनिवारी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पालिका तसेच संबंधित यंत्रणा सुसज्ज आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या वीकेण्डला मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये मुंबईकरांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. ८ ते १२ जून दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. यासंदर्भात सूचना देणारे पत्रक हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
मंगळवारी आणि गुरुवारी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. या सरी मान्सूनपूर्व असल्याचे हवामान विभागाने सांगितले. ८ ते १२ जूनपर्यंत पावसाचा वेग वाढेल, असा अंदाज वर्तवला असताना शुक्रवारी मात्र उघडीप दिसली. शुक्रवारी मुंबईत कमाल तापमानाची सरासरी ३३ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली, तर शहरात पावसाची नोंद ०.६ मिमी करण्यात आली. शुक्रवारपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. वीकेण्डच्या या दोन दिवसांत दक्षिण कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रालाही आज, शनिवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये आल्यावर थोडा रेंगाळलेला मान्सून गोव्यापाठोपाठ शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणानंतर येत्या २४ तासांत मान्सून मुंबईमध्ये येणार आहे. हवामानातील अनुकूल बदलांमुळे मध्य अरबी समुद्राचा अजून काही भाग, कर्नाटक किनारपट्टीचा उर्वरित भाग आणि गोव्याहून पुढे सरकत मान्सूनने शुक्रवारी कोकण मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले होतेच, यात मान्सूनच्या आगमनामुळे सगळेच जण सुखावले. या भागात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पाऊस जोरदार बरसला. पुढील २४ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रातही कोल्हापूर, महाबळेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावली. कोकणात रत्नागिरीमध्ये २९ मिमी आणि पणजीत ४८ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस कोकणात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी अतीतीव्र स्वरुपाच्या सरी उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात कोसळू शकतात. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. पावसाचा हा प्रभाव १२ जूनपर्यंत असेल. मात्र ९ ते ११ दरम्यान पावसाच्या सरींची तीव्रता सर्वाधिक असेल, असे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामध्ये नमूद केले आहे.
गुरुवारी पडला सर्वाधिक पाऊस
गुरुवारी झालेल्या पावसाच्या नोंदीत सर्वाधिक पावसाची नोंद बीकेसी येथे (७५ मिमी) झाली आहे. तर, दादर येथे ५८ मिमी, वांद्रे पश्चिमेला ५५ मिमी पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. ३५ ते ४५ मिमीच्या नोंदीमध्ये गोरेगाव, वरळी कॉलनी, सांताक्रूझ, अंधेरी हा परिसर होता.