म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची हद्दवाढ करून ती पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत करण्याबाबतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठराव गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी हा ठराव सभागृहात मांडला.
समतोल विकास व्हावा, पायाभूत सुविधांमध्ये वाढ व्हावी आणि मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी ही हद्दवाढ करण्यात आली आहे. यात उत्तरेला पालघर तालुक्याची उत्तर व पूर्व सीमा आणि नंतर वसई तालुक्याची तानसा नदीपर्यंतची पूर्व सीमा आणि नंतर तानसा नदीपर्यंत ही हद्दवाढ करण्यात आली आहे. पूर्वेला ही हद्दवाढ कल्याण, भिवंडी व अंबरनाथ या तालुक्यांच्या पूर्व सीमा आणि नंतर कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेलू ते कळंबोली तर्फ वरेडी आणि ताकवे, भालीवडी, सावळे, हेदवली, मांडवणे, भिवपुरी, हुमगाव, साईडोंबर, ढाक, साल्पे, खरवंडी ते चोचो गावापर्यंत आणि नंतर खालापूर तालुक्याची पूर्व सीमा इथपर्यंत करण्यात आली आहे. दक्षिणेला खालापूर,पेण आणि अलिबाग तालुक्यांची दक्षिण सीमा या हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आली आहे.
यावेळी सभागृहात किसन कथोरे यांनी मुरबाड आणि शहापूरचा यात समावेश करावा, अशी मागणी केली. सुरेश लाड यांनी कर्जत तालुक्यातील वगळलेल्या आदिवासी गावांचा समावेश करावा, अशी मागणी केली. तर, मनीषा चौधरी यांनी डहाणू तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा उपस्थित केला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचे निधन झाले, अजूनही निर्णय होत नाही, तो होणार आहे की नाही आणि डहाणू तालुक्यासाठी असलेली ९१ ची अधिसूचना रद्द करावी, असे मुद्दे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सूचनांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची हद्दवाढ करून ती पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत करण्याबाबतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठराव गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी हा ठराव सभागृहात मांडला.
समतोल विकास व्हावा, पायाभूत सुविधांमध्ये वाढ व्हावी आणि मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी ही हद्दवाढ करण्यात आली आहे. यात उत्तरेला पालघर तालुक्याची उत्तर व पूर्व सीमा आणि नंतर वसई तालुक्याची तानसा नदीपर्यंतची पूर्व सीमा आणि नंतर तानसा नदीपर्यंत ही हद्दवाढ करण्यात आली आहे. पूर्वेला ही हद्दवाढ कल्याण, भिवंडी व अंबरनाथ या तालुक्यांच्या पूर्व सीमा आणि नंतर कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेलू ते कळंबोली तर्फ वरेडी आणि ताकवे, भालीवडी, सावळे, हेदवली, मांडवणे, भिवपुरी, हुमगाव, साईडोंबर, ढाक, साल्पे, खरवंडी ते चोचो गावापर्यंत आणि नंतर खालापूर तालुक्याची पूर्व सीमा इथपर्यंत करण्यात आली आहे. दक्षिणेला खालापूर,पेण आणि अलिबाग तालुक्यांची दक्षिण सीमा या हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आली आहे.
यावेळी सभागृहात किसन कथोरे यांनी मुरबाड आणि शहापूरचा यात समावेश करावा, अशी मागणी केली. सुरेश लाड यांनी कर्जत तालुक्यातील वगळलेल्या आदिवासी गावांचा समावेश करावा, अशी मागणी केली. तर, मनीषा चौधरी यांनी डहाणू तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा उपस्थित केला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचे निधन झाले, अजूनही निर्णय होत नाही, तो होणार आहे की नाही आणि डहाणू तालुक्यासाठी असलेली ९१ ची अधिसूचना रद्द करावी, असे मुद्दे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सूचनांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.