१७ लाख रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
ठाण्यातील येऊर भागात बांधलेल्या फार्महाऊसचे पावसाळ्यात नुकसान झाल्याबद्दल तक्रारदाराला १२ लाख रुपये आणि मनस्तापासाठी आणखी पाच लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीला दिला. ही भरपाई देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
याप्रकरणी तक्रारदार शीतल जेम्स आणि मोनिका जेम्स या दोन बहिणींनी आयोगाकडे तक्रार केली होती. त्या राहात असलेल्या ‘शीतल जेम्स फार्मचे पावसाळ्यात नुकसान झाल्याच्या तक्रारीची आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य डी. आर. शीरसाव यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे, तक्रारदारांनी स्वतःच बाजू मांडली. तक्रारदारांनी प्रतिवादी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्या फार्म हाऊसच्या नुकसानीबद्दल ४५ लाख रुपयांची भरपाई मागितली होती. तक्रारदारांनी दहा वर्षांसाठी फार्महाऊससाठी विमा उतरविला होता. त्यात ४५ लाख रुपये घरासाठी आणि पाच लाख रुपये घराभोवतीचा परिसर, व्हरांडा यांचा समावेश होता. त्याबद्दल त्यांनी नियमित हप्ताही भरलेला होता. १५ व १६ जून, २००८ रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने व वादळामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याने त्यांनी आयोगापुढे तक्रार केली होती. घराचे नुकसान पावसामुळे नव्हे, तर घराच्या पायाची जमीन भुशभुशीत असल्याचा दावा प्रतिवादींनी केला होता.
प्रतिवादींच्या सर्व्हेअरने केलेल्या हिशेबानुसार, २००८ मध्ये असलेला बाजारभाव लक्षात घेता एकूण १२ लाख रुपये भरपाई रक्कम होते. तो मुद्दा विचारात घेऊन तक्रारदाराला १२ लाख रुपये भरपाई आणि मानसिक त्रासाबद्दल आणखी पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश आयोगाने कंपनीला दिला. त्यात तक्रारीच्या आदेशाचा दहा हजार रुपये खर्चाबद्दल देण्याचे आदेश आयोगाने दिला. भरपाई रकमेवर ९ टक्के व्याजही देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
ठाण्यातील येऊर भागात बांधलेल्या फार्महाऊसचे पावसाळ्यात नुकसान झाल्याबद्दल तक्रारदाराला १२ लाख रुपये आणि मनस्तापासाठी आणखी पाच लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीला दिला. ही भरपाई देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
याप्रकरणी तक्रारदार शीतल जेम्स आणि मोनिका जेम्स या दोन बहिणींनी आयोगाकडे तक्रार केली होती. त्या राहात असलेल्या ‘शीतल जेम्स फार्मचे पावसाळ्यात नुकसान झाल्याच्या तक्रारीची आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य डी. आर. शीरसाव यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे, तक्रारदारांनी स्वतःच बाजू मांडली. तक्रारदारांनी प्रतिवादी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्या फार्म हाऊसच्या नुकसानीबद्दल ४५ लाख रुपयांची भरपाई मागितली होती. तक्रारदारांनी दहा वर्षांसाठी फार्महाऊससाठी विमा उतरविला होता. त्यात ४५ लाख रुपये घरासाठी आणि पाच लाख रुपये घराभोवतीचा परिसर, व्हरांडा यांचा समावेश होता. त्याबद्दल त्यांनी नियमित हप्ताही भरलेला होता. १५ व १६ जून, २००८ रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने व वादळामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याने त्यांनी आयोगापुढे तक्रार केली होती. घराचे नुकसान पावसामुळे नव्हे, तर घराच्या पायाची जमीन भुशभुशीत असल्याचा दावा प्रतिवादींनी केला होता.
प्रतिवादींच्या सर्व्हेअरने केलेल्या हिशेबानुसार, २००८ मध्ये असलेला बाजारभाव लक्षात घेता एकूण १२ लाख रुपये भरपाई रक्कम होते. तो मुद्दा विचारात घेऊन तक्रारदाराला १२ लाख रुपये भरपाई आणि मानसिक त्रासाबद्दल आणखी पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश आयोगाने कंपनीला दिला. त्यात तक्रारीच्या आदेशाचा दहा हजार रुपये खर्चाबद्दल देण्याचे आदेश आयोगाने दिला. भरपाई रकमेवर ९ टक्के व्याजही देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.