म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूडमधील 'मीटू'चे वादळ अद्याप शमलेले नाही. अभिनेता नाना पाटेकर यांच्यानंतर आता आलोक नाथ यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लेखिका विनिता नंदा यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी रात्री आलोक नाथ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
चित्रपट निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आपल्यावरील अन्यायाला आठ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर वाचा फोडल्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा आणि यावर प्राथमिक चौकशी करून अखेर पोलिसांनी मंगळवारी रात्री आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. हे प्रकरण सन १९९८मधील असल्याने पोलिसांनी अद्याप आलोक नाथ यांच्यावर अटकेची कारवाई केलेली नाही.
अभिनेत्री अनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर बॉलिवूडसह विविध क्षेत्रात 'मीटू'चे वादळ उठले. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आलोक नाथ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यातच विनिता नंदा यांच्यासह अभिनेत्री संध्या मृदूल आणि दीपिका आमीन यांनीही आलोक नाथ यांच्यासोबत आलेले वाईट अनुभव प्रसारमाध्यमांसमोर आणले आहेत.
बॉलिवूडमधील 'मीटू'चे वादळ अद्याप शमलेले नाही. अभिनेता नाना पाटेकर यांच्यानंतर आता आलोक नाथ यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लेखिका विनिता नंदा यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी रात्री आलोक नाथ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
चित्रपट निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आपल्यावरील अन्यायाला आठ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर वाचा फोडल्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा आणि यावर प्राथमिक चौकशी करून अखेर पोलिसांनी मंगळवारी रात्री आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. हे प्रकरण सन १९९८मधील असल्याने पोलिसांनी अद्याप आलोक नाथ यांच्यावर अटकेची कारवाई केलेली नाही.
अभिनेत्री अनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर बॉलिवूडसह विविध क्षेत्रात 'मीटू'चे वादळ उठले. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आलोक नाथ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यातच विनिता नंदा यांच्यासह अभिनेत्री संध्या मृदूल आणि दीपिका आमीन यांनीही आलोक नाथ यांच्यासोबत आलेले वाईट अनुभव प्रसारमाध्यमांसमोर आणले आहेत.