म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
यंदा थोडासा उकाडा सहन करत नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. किमान तापमान वाढल्याने दिवाळीतील या परंपरेचा आनंद मात्र मुंबईकरांना घेता येणार नाही. कढत पाण्याने अंघोळीपेक्षा गार पाण्यानेच अंघोळ करून पहिल्या अंघोळीचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागेल.
आज, मंगळवारी नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ केली जाईल. गेल्या काही काळात दिवाळी पहाटची संस्कृती व्यापक होत आहे. त्यानुसार पहाटे अंघोळ करून मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी रसिक दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावतात. आल्हाददायक गारव्यामध्ये या गाण्यांचा आनंद घेण्याची मजा औरच असते.
आकाशकंदिलांसोबच खिडक्यांमधून पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी, निळ्या, जांभळ्या, लाल, हिरव्या रंगांची दिव्यांची तोरणेही सजली होती. केवळ घरेच नाही, तर दुकानेही या कंदील आणि तोरणांमुळे अधिक सुंदर दिसत होती. मंदिरांमध्ये पणत्या उजळल्या होत्या. दाराबाहेर रेखलेल्या रांगोळ्या, त्यावर पणत्या याची शोभा पाहणे ही दिवाळीतील मोठी पर्वणीच असते.
यंदा थोडासा उकाडा सहन करत नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. किमान तापमान वाढल्याने दिवाळीतील या परंपरेचा आनंद मात्र मुंबईकरांना घेता येणार नाही. कढत पाण्याने अंघोळीपेक्षा गार पाण्यानेच अंघोळ करून पहिल्या अंघोळीचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागेल.
आज, मंगळवारी नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ केली जाईल. गेल्या काही काळात दिवाळी पहाटची संस्कृती व्यापक होत आहे. त्यानुसार पहाटे अंघोळ करून मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी रसिक दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावतात. आल्हाददायक गारव्यामध्ये या गाण्यांचा आनंद घेण्याची मजा औरच असते.
आकाशकंदिलांसोबच खिडक्यांमधून पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी, निळ्या, जांभळ्या, लाल, हिरव्या रंगांची दिव्यांची तोरणेही सजली होती. केवळ घरेच नाही, तर दुकानेही या कंदील आणि तोरणांमुळे अधिक सुंदर दिसत होती. मंदिरांमध्ये पणत्या उजळल्या होत्या. दाराबाहेर रेखलेल्या रांगोळ्या, त्यावर पणत्या याची शोभा पाहणे ही दिवाळीतील मोठी पर्वणीच असते.