मुंबई:
पश्चिम रेल्वेसह हार्बर आणि मेट्रो अशी जोडणी असलेल्या अंधेरी स्थानकात अलीकडच्या काळात सुसज्ज डेक (तिकीट खिडकी आदीसाठी मोकळी जागा) उभारण्यात आला. मात्र या डेकचा फायदा प्रवाशांपेक्षा अनधिकृत फेरीवाल्यांनाच होत आहे. विशेष म्हणजे रेल्वे आणि महापालिका हद्दीतील वादामुळे या डेकवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कुणी करायची याविषयी संभ्रम आहे.
अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक १वरील स्थानकाच्या बाहेर पडण्याच्या मार्गालगतच फेरीवाले बसतात. सायंकाळी स्थानकातून घरी जाण्यासाठी प्रवाशांची सुरू असलेली लगबग आणि फेरीवाल्यांच्या दुकानांतील गर्दी यांमुळे प्रवाशांना विशेषत: महिला आणि तरुणींना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभव अंधेरी पश्चिमेकडे राहणाऱ्या ३१वर्षीय जयश्री प्रधान यांनी कथन केला. त्याचबरोबर स्थानकात भिकारी, भटके कुत्र्यांचाही वावर असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
अंधेरी स्थानकात २ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी केवळ पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. शिवाय हार्बर मार्ग आणि मेट्रो प्रवासी यांची संख्या लक्षात घेता रोज सुमारे ४ लाख प्रवाशांची स्थानकात वर्दळ असते. स्थानकात पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारे तीन पादचारी पूल आहेत. मात्र स्थानकातील मधल्या पुलांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्यामुळे सामान्य प्रवाशांना पुलाचा वापर करताना गर्दीतून वाट शोधावी लागते. एक पूल बंद असल्यामुळे स्थानकामधील पुलाचा वापर केला जातो. याच पुलावर अनधिकृत फेरीवाले मोठ्या संख्येने असतात. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असता, 'हे फेरीवाले रेल्वे हद्दीच्या बाहेर महापालिका हद्दीत बसतात', अशी माहिती क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती सदस्य (झेडआरयूसीसी) आणि मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस कैलाश वर्मा यांनी दिली. रेल्वे हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई होते. कारवाईनंतर फेरीवाले महापालिका हद्दीत जाऊन पुन्हा व्यवसाय सुरू करतात, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
१५० मीटर नियमाबाबत अज्ञान
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यावेळी उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळ, शिक्षण संस्था किंवा रेल्वे स्थानक परिसरातून १५० मीटर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले होते. याबाबत स्थानकाच्या पूर्वेकडील फेरीवाल्याला न्यायालयाच्या नियमाबाबत विचारले असता, '१५० मीटर म्हणजे ते काय असतं ? आम्ही आधीपासून येथे व्यवसाय करत आहोत. आम्ही इथेच व्यवसाय करणार', अशी प्रतिक्रिया फलाट क्रमांक १वरून दादर दिशेला बाहेर पडणाऱ्या मार्गालगत बस्तान बसवलेल्या फेरीवाल्याने दिली.
रेल्वे स्थानक आणि पुलांवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना नेहमीच गर्दीतून वाट काढावी लागते. रेल्वे आणि संबंधित महापालिकांकडून केवळ नावापुरती कारवाई केली जाते. मात्र काही दिवसांत पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'. रोजच्या प्रवासात तुम्हाला फेरीवाल्यांचा कुठे व कसा त्रास होतो, याचा अनुभव १०० शब्दांत matapratisad@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.
पश्चिम रेल्वेसह हार्बर आणि मेट्रो अशी जोडणी असलेल्या अंधेरी स्थानकात अलीकडच्या काळात सुसज्ज डेक (तिकीट खिडकी आदीसाठी मोकळी जागा) उभारण्यात आला. मात्र या डेकचा फायदा प्रवाशांपेक्षा अनधिकृत फेरीवाल्यांनाच होत आहे. विशेष म्हणजे रेल्वे आणि महापालिका हद्दीतील वादामुळे या डेकवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कुणी करायची याविषयी संभ्रम आहे.
अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक १वरील स्थानकाच्या बाहेर पडण्याच्या मार्गालगतच फेरीवाले बसतात. सायंकाळी स्थानकातून घरी जाण्यासाठी प्रवाशांची सुरू असलेली लगबग आणि फेरीवाल्यांच्या दुकानांतील गर्दी यांमुळे प्रवाशांना विशेषत: महिला आणि तरुणींना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभव अंधेरी पश्चिमेकडे राहणाऱ्या ३१वर्षीय जयश्री प्रधान यांनी कथन केला. त्याचबरोबर स्थानकात भिकारी, भटके कुत्र्यांचाही वावर असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
अंधेरी स्थानकात २ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी केवळ पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. शिवाय हार्बर मार्ग आणि मेट्रो प्रवासी यांची संख्या लक्षात घेता रोज सुमारे ४ लाख प्रवाशांची स्थानकात वर्दळ असते. स्थानकात पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारे तीन पादचारी पूल आहेत. मात्र स्थानकातील मधल्या पुलांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्यामुळे सामान्य प्रवाशांना पुलाचा वापर करताना गर्दीतून वाट शोधावी लागते. एक पूल बंद असल्यामुळे स्थानकामधील पुलाचा वापर केला जातो. याच पुलावर अनधिकृत फेरीवाले मोठ्या संख्येने असतात. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असता, 'हे फेरीवाले रेल्वे हद्दीच्या बाहेर महापालिका हद्दीत बसतात', अशी माहिती क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती सदस्य (झेडआरयूसीसी) आणि मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस कैलाश वर्मा यांनी दिली. रेल्वे हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई होते. कारवाईनंतर फेरीवाले महापालिका हद्दीत जाऊन पुन्हा व्यवसाय सुरू करतात, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
१५० मीटर नियमाबाबत अज्ञान
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यावेळी उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळ, शिक्षण संस्था किंवा रेल्वे स्थानक परिसरातून १५० मीटर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले होते. याबाबत स्थानकाच्या पूर्वेकडील फेरीवाल्याला न्यायालयाच्या नियमाबाबत विचारले असता, '१५० मीटर म्हणजे ते काय असतं ? आम्ही आधीपासून येथे व्यवसाय करत आहोत. आम्ही इथेच व्यवसाय करणार', अशी प्रतिक्रिया फलाट क्रमांक १वरून दादर दिशेला बाहेर पडणाऱ्या मार्गालगत बस्तान बसवलेल्या फेरीवाल्याने दिली.
रेल्वे स्थानक आणि पुलांवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना नेहमीच गर्दीतून वाट काढावी लागते. रेल्वे आणि संबंधित महापालिकांकडून केवळ नावापुरती कारवाई केली जाते. मात्र काही दिवसांत पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'. रोजच्या प्रवासात तुम्हाला फेरीवाल्यांचा कुठे व कसा त्रास होतो, याचा अनुभव १०० शब्दांत matapratisad@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.