अ‍ॅपशहर

फटाकेबंदी मोडल्यास कायद्याचे फटके

फटाके किती क्षमतेचे आणि कोणत्या वेळेत वाजवावेत याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. रात्री दहानंतर रस्त्यावर कोणी फटाके वाजविताना आढळल्यास न्यायालयाच्या विशेष आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने दिलेली वेळेची मर्यादा पाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Maharashtra Times 26 Oct 2018, 10:42 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम firework-ban


फटाके किती क्षमतेचे आणि कोणत्या वेळेत वाजवावेत याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. रात्री दहानंतर रस्त्यावर कोणी फटाके वाजविताना आढळल्यास न्यायालयाच्या विशेष आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने दिलेली वेळेची मर्यादा पाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांनुसार पोलिस आयुक्त विशेष आदेश जारी करून याबाबतची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना देतात. त्यानुसार रात्री दहानंतर फटाके फोडू नयेत, असे नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमांमार्फत कळविले जाईल. कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर भा.द.वि. कलम १८८ किंवा अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हे कृत्य त्या व्यक्तीने पहिल्यांदा केले, अजाणतेपणी केले की कसे यावर न्यायालयात युक्तिवाद होईल. न्यायालय दंड किंवा कारावासाची शिक्षा देऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरा फटाके फोडू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीच्या कालावधीत गस्त वाढविण्यात येणार असून, विशेषत: रात्री दहानंतर पोलिस गस्तींवर जास्त भर देण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणीही पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. सोशल मीडिया, फोन कॉल्स यांवरून जशा तक्रारी येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज