म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी पालिकेने परदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या दालनात स्वच्छतेचे सादरीकरण केले. मिठी नदी आणि पवई तलावात प्रायोगिक तत्त्वावर ही स्वच्छता करण्यात येणार असून त्यानंतर इतर ठिकाणीही ते वापरले जाणार आहे.
परदेशात नद्या हे त्या शहराचे वैभव असते. मुंबईतील एके काळच्या प्रसिद्ध नद्यांचे आता नाले झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पालिकेने कॅनडातील डीसीएल १७ या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिठी नदी आणि पवई तलावाची स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे १७ पद्धतीने तलाव, नद्यांची स्वच्छता करता येते. विविध देशांत यापूर्वी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून भारतात ते प्रथमच वापरण्यात येणार आहे. कॅनडातील दासून इंटरनॅशनल आणि इकोनिक एकता वेंचर्स या कंपन्यांनी याबाबतचे सादरीकरण केले.
या पद्धतीने जैवविविधेतला बाधा येत नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पाण्यातील हानिकारक रोगजन्य जिवाणूंचा नाश करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जात. या तंत्रज्ञानानुसार पाच ग्रॅम शुद्धिकारकामध्ये दहा लिटर पाणी शुद्ध करता येते. आतापर्यंत ढाका येथील तलाव, बँकॉक, थायलंड, ग्रेटर टोरंटो, कॅनडा, मिसिसिपी नदी आदी ठिकाणी प्रयोग करण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी पालिकेने परदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या दालनात स्वच्छतेचे सादरीकरण केले. मिठी नदी आणि पवई तलावात प्रायोगिक तत्त्वावर ही स्वच्छता करण्यात येणार असून त्यानंतर इतर ठिकाणीही ते वापरले जाणार आहे.
परदेशात नद्या हे त्या शहराचे वैभव असते. मुंबईतील एके काळच्या प्रसिद्ध नद्यांचे आता नाले झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पालिकेने कॅनडातील डीसीएल १७ या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिठी नदी आणि पवई तलावाची स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे १७ पद्धतीने तलाव, नद्यांची स्वच्छता करता येते. विविध देशांत यापूर्वी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून भारतात ते प्रथमच वापरण्यात येणार आहे. कॅनडातील दासून इंटरनॅशनल आणि इकोनिक एकता वेंचर्स या कंपन्यांनी याबाबतचे सादरीकरण केले.
या पद्धतीने जैवविविधेतला बाधा येत नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पाण्यातील हानिकारक रोगजन्य जिवाणूंचा नाश करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जात. या तंत्रज्ञानानुसार पाच ग्रॅम शुद्धिकारकामध्ये दहा लिटर पाणी शुद्ध करता येते. आतापर्यंत ढाका येथील तलाव, बँकॉक, थायलंड, ग्रेटर टोरंटो, कॅनडा, मिसिसिपी नदी आदी ठिकाणी प्रयोग करण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे पालिकेने म्हटले आहे.