मुंबई:
दूध दरासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी भडका उडाला आहे. शेतकरी संघटनेने आज सकाळपासूनच ठिकठिकाणी चक्काजाम सुरू केल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये दूध पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशी राज्यातील जनतेला दूध आंदोलनाचा खऱ्या अर्थाने फटका बसू लागला असून लोकांवर आता दूधही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. आणखी दोन दिवस हे आंदोलन असंच सुरू झाल्यास राज्यात दूध कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दरम्यान झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवायला सुरुवात केली आहे. सोलापूरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांनी वैराग-माढा रस्त्यावर चक्काजाम केला. या आंदोलनात शेतकरी कुटुंबकबिल्यासह उतरले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तर बुलडाण्यात बुलडाणा-नागपूर एसटी बस फोडण्यात आली. बुलडाण्यात आतापर्यंत तीन एसटींची तोडफोड करण्यात आली आहे.
पुण्यात टंचाई, मुंबईत उशिरानं
आंदोलकांच्या चक्काजाममुळे पुण्यात आज दूध पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पुण्यात दूध टंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवस दूध संकलन न झाल्याने चितळेंनीही दूध वितरण बंद केलं आहे. त्यामुळे पुणेकरांना चितळेंचं दूध मिळू शकणार नाही. तर मुंबईतही काही भागात दुधाचे टँकर पोहोचू न शकल्याने अमूल दूधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मनसेनेही गुजरातहून आलेल्या अमूलच्या दूधाला विरोध केल्याने दुधाचे टँकर मुंबईत पोहोचू शकले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दूध दरासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी भडका उडाला आहे. शेतकरी संघटनेने आज सकाळपासूनच ठिकठिकाणी चक्काजाम सुरू केल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये दूध पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशी राज्यातील जनतेला दूध आंदोलनाचा खऱ्या अर्थाने फटका बसू लागला असून लोकांवर आता दूधही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. आणखी दोन दिवस हे आंदोलन असंच सुरू झाल्यास राज्यात दूध कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दरम्यान झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवायला सुरुवात केली आहे. सोलापूरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांनी वैराग-माढा रस्त्यावर चक्काजाम केला. या आंदोलनात शेतकरी कुटुंबकबिल्यासह उतरले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तर बुलडाण्यात बुलडाणा-नागपूर एसटी बस फोडण्यात आली. बुलडाण्यात आतापर्यंत तीन एसटींची तोडफोड करण्यात आली आहे.
पुण्यात टंचाई, मुंबईत उशिरानं
आंदोलकांच्या चक्काजाममुळे पुण्यात आज दूध पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पुण्यात दूध टंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवस दूध संकलन न झाल्याने चितळेंनीही दूध वितरण बंद केलं आहे. त्यामुळे पुणेकरांना चितळेंचं दूध मिळू शकणार नाही. तर मुंबईतही काही भागात दुधाचे टँकर पोहोचू न शकल्याने अमूल दूधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मनसेनेही गुजरातहून आलेल्या अमूलच्या दूधाला विरोध केल्याने दुधाचे टँकर मुंबईत पोहोचू शकले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.