म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'फ्री काश्मीर' म्हणजे आझाद काश्मीरची मागणी नाही, अशी भूमिका मांडत, अशावेळी कारवाई करताना त्याची व्यवस्थित माहिती घ्या. दोन-चार अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून राहू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपल्या पक्षातील मंत्र्यांना दिला. 'असे प्रकार भाजपच्या कार्यकाळात सुरू होते. ते आपल्या कार्यकाळात होता कामा नयेत. अशा प्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे ते टाळायला हवेत', अशा सूचना करीत पवार यांनी भाजपलाही टोला लगावला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची तीन तास बैठक घेऊन सरकारमध्ये काम करताना घ्यायची काळजी आणि जनता व पक्षसंघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करताना मंत्र्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देतानाच, उपेक्षित व वंचित समाजघटकांमध्ये तसेच शहरी भागातही जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्याचे समजते. या बैठकीत पवार यांनी मंत्री अनिल देशमुख यांना काही सल्ले दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांच्या अशा बैठका घेतल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे तीन पक्षांमध्ये समन्वय कसा असावा, याबाबत शरद पवार यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री या नात्याने कोणती कामे प्राधान्याने करावीत याचे मार्गदर्शन शरद पवार यांनी केले, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना बैठकीनंतर दिली.
जनतेच्या कामांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे. पक्षसंघटना, कार्यकर्ते, राज्य सरकारमधील मंत्री आणि जनता तसेच उपेक्षित समाजघटक यांच्यात चांगला सुसंवाद राहायला हवा, अशा सूचना शरद पवार यांनी केल्याचे समजते.
'फ्री काश्मीर' म्हणजे आझाद काश्मीरची मागणी नाही, अशी भूमिका मांडत, अशावेळी कारवाई करताना त्याची व्यवस्थित माहिती घ्या. दोन-चार अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून राहू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपल्या पक्षातील मंत्र्यांना दिला. 'असे प्रकार भाजपच्या कार्यकाळात सुरू होते. ते आपल्या कार्यकाळात होता कामा नयेत. अशा प्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे ते टाळायला हवेत', अशा सूचना करीत पवार यांनी भाजपलाही टोला लगावला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची तीन तास बैठक घेऊन सरकारमध्ये काम करताना घ्यायची काळजी आणि जनता व पक्षसंघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करताना मंत्र्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देतानाच, उपेक्षित व वंचित समाजघटकांमध्ये तसेच शहरी भागातही जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्याचे समजते. या बैठकीत पवार यांनी मंत्री अनिल देशमुख यांना काही सल्ले दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांच्या अशा बैठका घेतल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे तीन पक्षांमध्ये समन्वय कसा असावा, याबाबत शरद पवार यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री या नात्याने कोणती कामे प्राधान्याने करावीत याचे मार्गदर्शन शरद पवार यांनी केले, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना बैठकीनंतर दिली.
जनतेच्या कामांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे. पक्षसंघटना, कार्यकर्ते, राज्य सरकारमधील मंत्री आणि जनता तसेच उपेक्षित समाजघटक यांच्यात चांगला सुसंवाद राहायला हवा, अशा सूचना शरद पवार यांनी केल्याचे समजते.