म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरालगत मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडने २७ हजार २८४.३६ चौरस मीटरचा भूखंड पालिकेला हस्तांतरण करण्यास केलेला विरोध न्यायालयात टिकू शकलेला नाही. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने मफतलालची याचिका रद्दबातल करण्याचे आदेश गुरुवारी दिले.
मफतलालच्या या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याची पालिकेची योजना आहे. हा भूखंड मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार ७ जानेवारी २०१७ रोजी पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र या हस्तांतरणाविरोधात मफतलालने उच्च न्यायालयाकडे विनंती याचिका दाखल केली होती.
राणीचा बागमध्ये उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटरचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्टीने देण्यात आला होता. याबाबत राज्य सरकारने २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व भूखंडाचा भाडेपट्ट्याचा कालावधी २०१७ मध्ये संपल्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे भूखंडाच्या निम्मा (५० टक्के) म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग पालिकेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र भूखंड हस्तांतरित करण्याविरोधात मफतलालने याचिका दाखल केली होती. आता हा भूखंड पालिकेला मिळाल्याने राणीबागच्या विस्तारीकरणास अधिक गती मिळेल, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरालगत मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडने २७ हजार २८४.३६ चौरस मीटरचा भूखंड पालिकेला हस्तांतरण करण्यास केलेला विरोध न्यायालयात टिकू शकलेला नाही. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने मफतलालची याचिका रद्दबातल करण्याचे आदेश गुरुवारी दिले.
मफतलालच्या या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याची पालिकेची योजना आहे. हा भूखंड मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार ७ जानेवारी २०१७ रोजी पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र या हस्तांतरणाविरोधात मफतलालने उच्च न्यायालयाकडे विनंती याचिका दाखल केली होती.
राणीचा बागमध्ये उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटरचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्टीने देण्यात आला होता. याबाबत राज्य सरकारने २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व भूखंडाचा भाडेपट्ट्याचा कालावधी २०१७ मध्ये संपल्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे भूखंडाच्या निम्मा (५० टक्के) म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग पालिकेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र भूखंड हस्तांतरित करण्याविरोधात मफतलालने याचिका दाखल केली होती. आता हा भूखंड पालिकेला मिळाल्याने राणीबागच्या विस्तारीकरणास अधिक गती मिळेल, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.