म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांपुढे वैयक्तिक आणि सामाजिक संघर्षाला तोंड देतानाच वयात येत असलेल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गंभीर समस्या आ वासून उभी आहे. शेतात काही पिकत नाही, घरात खायला अन्न नाही, आजारपणावर खर्च करायला पैसा नाही, अशा अवस्थेत वयात आलेल्या मुलांना ताणतणावांना तोंड देताना नेमके काय होतंय, हे लक्षात यायलाही खूप उशीर होत आहे.
शेती आणि सरकारी योजनांसंदर्भातील विविध योजनांच्या पूर्ततेच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकरी कुटुंबांतील अनेक स्त्रियांनी मुलांमधील हे वाढते मानसिक ताणतणाव, आजार, नैराश्याचे अनेक अनुभव कथन केले. यवतमाळच्या सोयरा पवार यांचा मुलगा दहा वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या शेतकरी वडिलांनी शेतात विष पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर आईला घरात टोचून बोलणे सुरू झाले. शाळेत अभ्यासात, खेळामध्ये अव्वल असणारा मुलगा शांत राहू लागला. त्याने सगळ्यांशी बोलणे टाकले. या मुलाला समुपदेशन करून बोलते करावे लागले. विदर्भातीलच सुनीता जाधव (नाव बदलले आहे) यांच्या सोळा वर्षांच्या मुलाची वेगळी व्यथा. वडिलांच्या निधनानंतर शेती कुणी करायची, त्यातले हिस्से कुणाचे यावरून सुरू झालेल्या वादामुळे तो नैराश्येच्या गर्तेत गेला. सुरुवातीला तंबाखूच्या अन् नंतर दारूच्या आहारी गेला. यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची, मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे, हे कुणीच समजावून न सांगितल्याने उपचार उशिरा सुरू झाले. पैशांअभावी ते पूर्णही करता आले नाही. (मानसिक ताणाखाली...वृत्त...१०)
'योग्य वेळी मदतच नाही'
महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुलकर्णी या अतिसंवेदनशील समस्येविषयी सांगतात की, 'महिला त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उघडपणे सांगत, मांडत नाहीत, तिथे मुलांच्या ताणतणावांची ओळख लवकर कशी होणार? ती जाणीव त्यांना उशिरा होते. अशिक्षितपणा, पतीच्या निधनाचा धक्का आणि मानसिक आरोग्यसेवांची उपलब्धता नसल्यामुळे तरुण मुलांना योग्य वेळी वैद्यकीय मदत हवी आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.'
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांपुढे वैयक्तिक आणि सामाजिक संघर्षाला तोंड देतानाच वयात येत असलेल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गंभीर समस्या आ वासून उभी आहे. शेतात काही पिकत नाही, घरात खायला अन्न नाही, आजारपणावर खर्च करायला पैसा नाही, अशा अवस्थेत वयात आलेल्या मुलांना ताणतणावांना तोंड देताना नेमके काय होतंय, हे लक्षात यायलाही खूप उशीर होत आहे.
शेती आणि सरकारी योजनांसंदर्भातील विविध योजनांच्या पूर्ततेच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकरी कुटुंबांतील अनेक स्त्रियांनी मुलांमधील हे वाढते मानसिक ताणतणाव, आजार, नैराश्याचे अनेक अनुभव कथन केले. यवतमाळच्या सोयरा पवार यांचा मुलगा दहा वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या शेतकरी वडिलांनी शेतात विष पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर आईला घरात टोचून बोलणे सुरू झाले. शाळेत अभ्यासात, खेळामध्ये अव्वल असणारा मुलगा शांत राहू लागला. त्याने सगळ्यांशी बोलणे टाकले. या मुलाला समुपदेशन करून बोलते करावे लागले. विदर्भातीलच सुनीता जाधव (नाव बदलले आहे) यांच्या सोळा वर्षांच्या मुलाची वेगळी व्यथा. वडिलांच्या निधनानंतर शेती कुणी करायची, त्यातले हिस्से कुणाचे यावरून सुरू झालेल्या वादामुळे तो नैराश्येच्या गर्तेत गेला. सुरुवातीला तंबाखूच्या अन् नंतर दारूच्या आहारी गेला. यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची, मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे, हे कुणीच समजावून न सांगितल्याने उपचार उशिरा सुरू झाले. पैशांअभावी ते पूर्णही करता आले नाही. (मानसिक ताणाखाली...वृत्त...१०)
'योग्य वेळी मदतच नाही'
महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुलकर्णी या अतिसंवेदनशील समस्येविषयी सांगतात की, 'महिला त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उघडपणे सांगत, मांडत नाहीत, तिथे मुलांच्या ताणतणावांची ओळख लवकर कशी होणार? ती जाणीव त्यांना उशिरा होते. अशिक्षितपणा, पतीच्या निधनाचा धक्का आणि मानसिक आरोग्यसेवांची उपलब्धता नसल्यामुळे तरुण मुलांना योग्य वेळी वैद्यकीय मदत हवी आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.'