म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भारतीयांचे मन अधिक सृजनशील असून, प्रत्यक्षापेक्षा पुढे जाऊन विचार करण्याची कल्पकता त्यात आहे. तसेच आपली अध्यपनपद्धती अधिक आनंददायी करण्याची गरज आहे. अशा महोत्सवातूनच भावी वैज्ञानिक घडतात, असे प्रतिपादन सहाव्या एनईएस राष्ट्रीय विज्ञान महोत्सवात आयसीटीचे प्रसिद्ध वैज्ञानिक प्रा. एस. एस. भागवत यांनी केले.
साऊथ एशियन आयबी स्कूल असोसिएशन (एसएआयबीएसए) यांच्या सहकार्याने मुलुंड (प.) येथील एनईएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा विज्ञान महोत्सव
आयोजित करण्यात आला होता. ‘सस्टेनेबिलिटी-रोल ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ हा महोत्सवाचा यंदाचा विषय होता. नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तब्बल ३०० कल्पक प्रकल्प सादर केले. त्यात पॉपकॉर्न मशिन, ए ट्रीप टू मर्क्युरी, बायोगॅस प्लॅण्ट, मॉडर्न लाइफ इन व्हिलेज, न्यूटन्स क्रॅडल, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हैड्रो पॉवर एनर्जी, सौर व पवन ऊर्जा, रोबोट आदींचा समावेश होता. उडते ड्रोन व वैज्ञानिक चमत्कारविषयक प्रयोग महोत्सवाचे आकर्षण ठरले. याशिवाय वैज्ञानिक विषयावर आधारित स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
भारतीयांचे मन अधिक सृजनशील असून, प्रत्यक्षापेक्षा पुढे जाऊन विचार करण्याची कल्पकता त्यात आहे. तसेच आपली अध्यपनपद्धती अधिक आनंददायी करण्याची गरज आहे. अशा महोत्सवातूनच भावी वैज्ञानिक घडतात, असे प्रतिपादन सहाव्या एनईएस राष्ट्रीय विज्ञान महोत्सवात आयसीटीचे प्रसिद्ध वैज्ञानिक प्रा. एस. एस. भागवत यांनी केले.
साऊथ एशियन आयबी स्कूल असोसिएशन (एसएआयबीएसए) यांच्या सहकार्याने मुलुंड (प.) येथील एनईएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा विज्ञान महोत्सव
आयोजित करण्यात आला होता. ‘सस्टेनेबिलिटी-रोल ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ हा महोत्सवाचा यंदाचा विषय होता. नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तब्बल ३०० कल्पक प्रकल्प सादर केले. त्यात पॉपकॉर्न मशिन, ए ट्रीप टू मर्क्युरी, बायोगॅस प्लॅण्ट, मॉडर्न लाइफ इन व्हिलेज, न्यूटन्स क्रॅडल, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हैड्रो पॉवर एनर्जी, सौर व पवन ऊर्जा, रोबोट आदींचा समावेश होता. उडते ड्रोन व वैज्ञानिक चमत्कारविषयक प्रयोग महोत्सवाचे आकर्षण ठरले. याशिवाय वैज्ञानिक विषयावर आधारित स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.