म. टा. प्रतिनिधी, मुंबई
तांत्रिक गोंधळामुळे बुधवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आलेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली. त्यामुळे प्रवेशकोंडी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेचा वेग वाढला असून संध्याकाळपर्यंत एक लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण केला.
सर्व त्रुटी दूर करण्यात आल्यानंतर गुरुवारपासून ही वेबसाइट सुरू करण्यात आली.
गेल्या वर्षी एकूण दोन लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मंगळवारी ऑनलाइन प्रक्रिया बंद होताना अर्जाचा दुसरा भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ७५ हजार होता. त्यात झपाट्याने वाढ झाली असून, तो आकडा एक लाख ७० हजार पर्यंत पोहचला आहे. गुरुवारी सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला आहे. त्यामुळे २७ जूनपर्यंत प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता आहे. तरीही गरज भासल्यास अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यावर विचार केला जाईल, असे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
तांत्रिक गोंधळामुळे बुधवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आलेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली. त्यामुळे प्रवेशकोंडी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेचा वेग वाढला असून संध्याकाळपर्यंत एक लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण केला.
सर्व त्रुटी दूर करण्यात आल्यानंतर गुरुवारपासून ही वेबसाइट सुरू करण्यात आली.
गेल्या वर्षी एकूण दोन लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मंगळवारी ऑनलाइन प्रक्रिया बंद होताना अर्जाचा दुसरा भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ७५ हजार होता. त्यात झपाट्याने वाढ झाली असून, तो आकडा एक लाख ७० हजार पर्यंत पोहचला आहे. गुरुवारी सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला आहे. त्यामुळे २७ जूनपर्यंत प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता आहे. तरीही गरज भासल्यास अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यावर विचार केला जाईल, असे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.