म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी आणि रेल्वेने प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली असली तरीही ही व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यातच दक्षिण रेल्वेच्या रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे दक्षिणेतील अधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे. यामुळे सुखकर्त्याच्या आगमनाला निघालेल्या प्रवाशांना गर्दीचे विघ्न पार करूनच गाव गाठावा लागणार आहे.
गणपतीच्या आधी मुंबई-लांजासाठी खासगी बसच्या तिकिटासाठी ४०० ते ५०० रुपये आकारले जात होते. मात्र, गणपतीच्या काळात हे दर ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचले. उत्सवाच्या काळात होणारी अवास्तव दरवाढ पाहता 'परिवहन विभाग अस्तित्वात आहे की नाही ?' असा प्रश्न उपस्थित होतो. सण-उत्सवांच्या काळात खासगी बसचालकांकडून सर्रास हजारो रुपयांपर्यंत तिकीट दर आकारले जातात. यावर कारवाई होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते. मात्र, परिवहन विभागाकडून खासगी चालकांवर कृपा का दाखवली जाते? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असल्याचे दादर पश्चिमेकडील राहणाऱ्या ४८ वर्षीय दत्ता पाटील यांनी सांगितले.
दक्षिण रेल्वेवरील पालक्कड विभागात मुसळधार पावसामुळे मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. यामुळे या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी गणपती विशेष रेल्वेकडे धाव घेतली. परिणामी गणपती विशेष म्हणून चालवण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. त्यातच शनिवार-रविवारी सुट्टीच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी बहुतांश प्रवाशांनी शुक्रवारीच मिळेल त्या गाडीने कोकणाकडे कूच केली. जागा नसल्यामुळे अनेक प्रवाशांनी उभे राहून प्रवास करणे पसंत केले.
गणेशोत्सव आणि होळी हे सण कोकणात धूमधडाक्यात साजरे होतात. यामुळे या सणांना प्रवासी मोठ्या संख्येने कोकणात जातात. हे माहीत असूनही परिवहन विभागाकडून खासगी बसच्या भाडेवाढीला आवर घालण्यासाठी कोणतीच यंत्रणा राबवली जात नाही. दादर, परळ यांसारख्या ठिकाणी सायंकाळी ७नंतर खासगी बसमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. या संपूर्ण परिस्थितीत खासगी बसवर न होणारी कारवाई पाहता प्रवासी लुटीला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते.
-नंदिनी सुतार, लालबाग
आधीच गर्दी, त्यात दरड कोसळल्याने मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. एकूण काय, विशेष गाड्या सोडल्या आणि नियमित गाड्या खोळंबल्य. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. एसटी-रेल्वेने वाहतुकीची जादा व्यवस्था केली असली तरी प्रवासीसंख्या पाहता ही व्यवस्था अपुरी आहे. शिवाय खासगी बसच्या लुटीवर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे कोकणवासीयांना मानसिक आणि आर्थिक हालही सहन करावे लागणार आहे.
-राम माने, करीरोड
..........
रेल्वे ही एसटी आणि बसच्या तुलनेत स्वस्त असल्याने साहजिकच प्रवासी आधी रेल्वे तिकिट आरक्षणासाठी प्रयत्न करतो. रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर अन्य पर्यायांची शोध घेतो. खासगी बस चालकांकडून होणारी दरवाढ ही उत्सव काळातील महत्त्वाची समस्या आहे. दरवर्षी मंत्र्यांकडून यांच्यावर अंकुश ठेवण्याची घोषणा करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्या उपाययोजना केवळ रद्दी वाढवण्याचे काम करतात.
-निरंजन सावंत, परळ
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त वाहतूक
-एसटी: २२०० गाड्या
- रेल्वे: २१० मेल-एक्स्प्रेस आणि ६४७ अतिरिक्त डब्यांची जोडणी (तात्पुरत्या स्वरूपात)
या मेल-एक्स्प्रेसला मागणी...
गणेशोत्वात कोकणात जाण्यासाठी जनशताब्दी, मांडवी, तुतारी, कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची प्रथम पसंती असते. १२० दिवसांपूर्वी या गाड्यांच्या प्रतीक्षा यादीने हजाराचा आकडा पार केला. अखेर प्रतीक्षा यादीतील तिकिटे रद्द करण्यात आली. त्याबाबत संबंधित प्रवाशांना मोबाइलवर एसएमएसमार्फत सूचना देण्यात आल्या. यानंतर जादा गाड्यांचीही प्रतीक्षा यादी ३००च्या पार झाल्याची सध्या परिस्थिती असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
खासगी बसदरवाढ
मार्ग......... गणपतीच्या काळात सामान्य वेळी
मुंबई - रत्नागिरी १२००-१३०० ६००-७००
मुंबई - संगमेश्वर १२००-१३०० ६००-७००
मुंबई - चिपळूण १५००-१६०० ८००-९००
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी आणि रेल्वेने प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली असली तरीही ही व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यातच दक्षिण रेल्वेच्या रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे दक्षिणेतील अधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे. यामुळे सुखकर्त्याच्या आगमनाला निघालेल्या प्रवाशांना गर्दीचे विघ्न पार करूनच गाव गाठावा लागणार आहे.
गणपतीच्या आधी मुंबई-लांजासाठी खासगी बसच्या तिकिटासाठी ४०० ते ५०० रुपये आकारले जात होते. मात्र, गणपतीच्या काळात हे दर ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचले. उत्सवाच्या काळात होणारी अवास्तव दरवाढ पाहता 'परिवहन विभाग अस्तित्वात आहे की नाही ?' असा प्रश्न उपस्थित होतो. सण-उत्सवांच्या काळात खासगी बसचालकांकडून सर्रास हजारो रुपयांपर्यंत तिकीट दर आकारले जातात. यावर कारवाई होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते. मात्र, परिवहन विभागाकडून खासगी चालकांवर कृपा का दाखवली जाते? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असल्याचे दादर पश्चिमेकडील राहणाऱ्या ४८ वर्षीय दत्ता पाटील यांनी सांगितले.
दक्षिण रेल्वेवरील पालक्कड विभागात मुसळधार पावसामुळे मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. यामुळे या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी गणपती विशेष रेल्वेकडे धाव घेतली. परिणामी गणपती विशेष म्हणून चालवण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. त्यातच शनिवार-रविवारी सुट्टीच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी बहुतांश प्रवाशांनी शुक्रवारीच मिळेल त्या गाडीने कोकणाकडे कूच केली. जागा नसल्यामुळे अनेक प्रवाशांनी उभे राहून प्रवास करणे पसंत केले.
गणेशोत्सव आणि होळी हे सण कोकणात धूमधडाक्यात साजरे होतात. यामुळे या सणांना प्रवासी मोठ्या संख्येने कोकणात जातात. हे माहीत असूनही परिवहन विभागाकडून खासगी बसच्या भाडेवाढीला आवर घालण्यासाठी कोणतीच यंत्रणा राबवली जात नाही. दादर, परळ यांसारख्या ठिकाणी सायंकाळी ७नंतर खासगी बसमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. या संपूर्ण परिस्थितीत खासगी बसवर न होणारी कारवाई पाहता प्रवासी लुटीला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते.
-नंदिनी सुतार, लालबाग
आधीच गर्दी, त्यात दरड कोसळल्याने मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. एकूण काय, विशेष गाड्या सोडल्या आणि नियमित गाड्या खोळंबल्य. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. एसटी-रेल्वेने वाहतुकीची जादा व्यवस्था केली असली तरी प्रवासीसंख्या पाहता ही व्यवस्था अपुरी आहे. शिवाय खासगी बसच्या लुटीवर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे कोकणवासीयांना मानसिक आणि आर्थिक हालही सहन करावे लागणार आहे.
-राम माने, करीरोड
..........
रेल्वे ही एसटी आणि बसच्या तुलनेत स्वस्त असल्याने साहजिकच प्रवासी आधी रेल्वे तिकिट आरक्षणासाठी प्रयत्न करतो. रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर अन्य पर्यायांची शोध घेतो. खासगी बस चालकांकडून होणारी दरवाढ ही उत्सव काळातील महत्त्वाची समस्या आहे. दरवर्षी मंत्र्यांकडून यांच्यावर अंकुश ठेवण्याची घोषणा करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्या उपाययोजना केवळ रद्दी वाढवण्याचे काम करतात.
-निरंजन सावंत, परळ
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त वाहतूक
-एसटी: २२०० गाड्या
- रेल्वे: २१० मेल-एक्स्प्रेस आणि ६४७ अतिरिक्त डब्यांची जोडणी (तात्पुरत्या स्वरूपात)
या मेल-एक्स्प्रेसला मागणी...
गणेशोत्वात कोकणात जाण्यासाठी जनशताब्दी, मांडवी, तुतारी, कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची प्रथम पसंती असते. १२० दिवसांपूर्वी या गाड्यांच्या प्रतीक्षा यादीने हजाराचा आकडा पार केला. अखेर प्रतीक्षा यादीतील तिकिटे रद्द करण्यात आली. त्याबाबत संबंधित प्रवाशांना मोबाइलवर एसएमएसमार्फत सूचना देण्यात आल्या. यानंतर जादा गाड्यांचीही प्रतीक्षा यादी ३००च्या पार झाल्याची सध्या परिस्थिती असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
खासगी बसदरवाढ
मार्ग......... गणपतीच्या काळात सामान्य वेळी
मुंबई - रत्नागिरी १२००-१३०० ६००-७००
मुंबई - संगमेश्वर १२००-१३०० ६००-७००
मुंबई - चिपळूण १५००-१६०० ८००-९००