म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक ठरत असतानाच सोमवारी विचित्र अपघातात मध्य रेल्वेवर भांडुप येथे एका गँगमनचा अपघाती मृत्यू झाला. अमित कुमार (२७) असे त्याचे नाव असून, नेत्रावती एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे गँगमनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
भांडुप आणि नाहूर स्थानकादरम्यान सोमवारी गँगमनचा एक चमू नेहमीप्रमाणे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करीत होता. त्याचवेळी दुपारी १२च्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसल्याने चमूतील अमित कुमारचा मृत्यू झाला. यापूर्वीही गँगमनच्या अपघाती मृत्यूंमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आला आहे. परंतु त्यावर काहीही उपाय न योजल्याने गँगमन धोकादायक स्थितीत ड्युटी बजावत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात काही महिन्यांपासून विभागीय रेल्वे आयुक्तांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी विद्याविहारजवळ चार गँगमनचा मृत्यू ओढवला होता.
रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक ठरत असतानाच सोमवारी विचित्र अपघातात मध्य रेल्वेवर भांडुप येथे एका गँगमनचा अपघाती मृत्यू झाला. अमित कुमार (२७) असे त्याचे नाव असून, नेत्रावती एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे गँगमनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
भांडुप आणि नाहूर स्थानकादरम्यान सोमवारी गँगमनचा एक चमू नेहमीप्रमाणे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करीत होता. त्याचवेळी दुपारी १२च्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसल्याने चमूतील अमित कुमारचा मृत्यू झाला. यापूर्वीही गँगमनच्या अपघाती मृत्यूंमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आला आहे. परंतु त्यावर काहीही उपाय न योजल्याने गँगमन धोकादायक स्थितीत ड्युटी बजावत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात काही महिन्यांपासून विभागीय रेल्वे आयुक्तांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी विद्याविहारजवळ चार गँगमनचा मृत्यू ओढवला होता.