मुंबई:
राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी सरकारची मुख्यमंत्री महिला असावी, अशी आग्रही मागणी करण्यासाठी मिशन महिला मुख्यमंत्री अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत महिलांच्या अधिकाधिक प्रतिनिधीत्वाच्या मागणीसाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी 'गरबा आंदोलन' होणार आहे. महिलांना लोकसभा व विधानसभेत ५०% आरक्षण मिळायलाच हवे, जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी, आम्हाला हवी महिला मुख्यामंत्री इत्यादी विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मिशन मुख्यमंत्री या अभियानाची भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या सरकारचे नेतृत्व महिलेने करावे, म्हणजेच महिला मुख्यमंत्री असावी असा विचार त्यांनी प्रखरपणे मांडला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी पक्षांर्गत महिला धोरण असावे व महिलांची राजकरणांत संख्या वाढल्यास सत्तेचे विकेंद्रीकरण आणि राज्यकारभार पार्दशक होण्यास हातभर लागेल आशी इच्छा व्यक्त केली.
मिशन महिला मुख्यमंत्रीचे निमंत्रक अमोल स. भा. मडापे यांनी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्हाला महिला मुख्यमंत्री मिळावी आशी इच्छा त्यांनी व्यत्त केली. येत्या गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० ते ५.०० आझाद मैदान येथे अभिनव असे 'गरबा आंदोलन' होणार असून खाली दिलेल्या विषयांवर हे आंदोलन होणार आहे.
१. महिला आघाडीशी चर्चा करुन पक्षांचे अंतर्गत महिला धोरण तयार करावे.
२. महिला आघाडीला सत्तास्थानी संधी देऊन दैनंदिन निर्णय प्रक्रियेत सहभागी करावे.
३. येत्या विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी.
४. महिला मुख्यामंत्री मिशन पक्षपातळीवर हाती घेऊन महाराष्ट्र राज्य ही मागे नाही हे सिद्ध करावे.
५. विधानसभा व लोकसभेतील ५०% महिला आरक्षण मंजुरीसाठी विधेयकाचा कसोशीने पाठपुरावा करावा.
राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी सरकारची मुख्यमंत्री महिला असावी, अशी आग्रही मागणी करण्यासाठी मिशन महिला मुख्यमंत्री अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत महिलांच्या अधिकाधिक प्रतिनिधीत्वाच्या मागणीसाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी 'गरबा आंदोलन' होणार आहे. महिलांना लोकसभा व विधानसभेत ५०% आरक्षण मिळायलाच हवे, जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी, आम्हाला हवी महिला मुख्यामंत्री इत्यादी विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मिशन मुख्यमंत्री या अभियानाची भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या सरकारचे नेतृत्व महिलेने करावे, म्हणजेच महिला मुख्यमंत्री असावी असा विचार त्यांनी प्रखरपणे मांडला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी पक्षांर्गत महिला धोरण असावे व महिलांची राजकरणांत संख्या वाढल्यास सत्तेचे विकेंद्रीकरण आणि राज्यकारभार पार्दशक होण्यास हातभर लागेल आशी इच्छा व्यक्त केली.
मिशन महिला मुख्यमंत्रीचे निमंत्रक अमोल स. भा. मडापे यांनी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्हाला महिला मुख्यमंत्री मिळावी आशी इच्छा त्यांनी व्यत्त केली. येत्या गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० ते ५.०० आझाद मैदान येथे अभिनव असे 'गरबा आंदोलन' होणार असून खाली दिलेल्या विषयांवर हे आंदोलन होणार आहे.
१. महिला आघाडीशी चर्चा करुन पक्षांचे अंतर्गत महिला धोरण तयार करावे.
२. महिला आघाडीला सत्तास्थानी संधी देऊन दैनंदिन निर्णय प्रक्रियेत सहभागी करावे.
३. येत्या विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी.
४. महिला मुख्यामंत्री मिशन पक्षपातळीवर हाती घेऊन महाराष्ट्र राज्य ही मागे नाही हे सिद्ध करावे.
५. विधानसभा व लोकसभेतील ५०% महिला आरक्षण मंजुरीसाठी विधेयकाचा कसोशीने पाठपुरावा करावा.