म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
आहाराच्या आणि जगण्याच्याही वेगवान सवयींमुळे आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत आहेत. या साऱ्याचा एकत्रित परिणाम वयात येण्याच्या प्रक्रियेवरही होत असून मुलींचे मासिक पाळी येण्याचे वय कमी होत आहे. लॅन्सेट या वैद्यकीय अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. मासिक पाळी आल्यानंतर मुलींच्या शरीरात पाळी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. प्रजनन आरोग्य व पुनरुत्पादन प्रक्रियेसाठी त्यांचे शरीर तयार होत असते. पूर्वी हा बदल १४ ते १५ वर्षांपासून होत होता. आता मात्र हे वय अलीकडे, म्हणजेच दहा ते तेरा वर्षांपर्यंत मागे आले आहे.
करिअरसाठी उशिरा होणारे विवाह, वाढत्या वयामध्येही मूल होऊ न देण्याचा निर्णय़, उशिरा होणारी बाळंतपणे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम पुढील पिढीवर होताना दिसत आहे. कमी वयात येणाऱ्या मासिक पाळीमुळे मुली लहान वयात मोठ्या दिसू लागतात. त्यांची शारीरिक वाढ जलद होत असली तरीही मानसिक व भावनिक समज सक्षम होत नाही. त्यामुळे प्रजनन आरोग्याशी संबधित माहिती सोप्या प्रकारे त्यांना सांगणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पूर्वी किशोरवयीन वयोगट हा १० ते १९ वर्ष होता. आता वयात येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होत असल्याने हा वयोगट १० ते २४ असा प्रमाणित धरण्यात यावा, असेही निरीक्षण किशोरवयीन आणि आरोग्य या गटात केलेल्या अभ्यासात मांडण्यात आला आहे. सुसान एम सॉवर यांनी केलेल्या या अभ्यासामध्ये विविध देशांमध्ये हा किशोरवयीन वयोगटांमध्ये हा प्रभाव आढळून आला आहे. यासंदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली मोहिते म्हणाल्या,'मुंबईसारख्या शहरांमध्ये हा बदल सर्रास दिसून येतो. पूर्वी मुलींचे वयात येण्याचे वय १५ होते, आता ते ११ इतकेही दिसते. मात्र पाळी त्याहून अधिक लवकर येत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.'
मासिक पाळी लवकर आल्यामुळे काहीवेळा नैराश्य, एकटेपणा जाणवण्याची शक्यता असते. तर काही मुलींमध्ये उंचीसाठी जी संप्रेरके गरजेची असतात, ती पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळे मुलींची उंची वाढत नाही. मस्तिष्क, स्त्रीबीजकोष आणि बीजांड यांची एकमेकांशी निगडित साखळी तयार होऊन त्याचाही परिणाम अंतर्गत व बाह्य वाढीवर होत असतो.
महानगरांत अधिक प्रमाण
या अहवालामध्ये दिलेली निरीक्षणे प्रत्यक्षात भारतातील महानगरांतील मुलींमध्ये दिसू लागली आहेत. पूर्वी मुलग्यांचे वयात येण्याचे प्रमाण मुलींपेक्षा दोनेक वर्ष पुढे होते. आता तेही मागे सरकताना दिसते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी 'काही मुलींमध्ये मासिक पाळीची सुरवात होते, मात्र त्यानंतर ती अनियमित होते. त्यात सातत्य राहत नाही. अतिरिक्त रक्तस्त्राव आणि पोटात तीव्र वेदना होतात. त्यामुळे दहा वर्षांच्याही आधी पाळी येत असेल तर यासाठीही डॉक्टरांची मदत घ्यायला हवी,' असे सांगितले. बाह्य घटकांमध्येही मेंदूतल्या संप्रेरकांना चेतावणी देणारे अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळेही मासिक पाळी लवकर येते, असे निरीक्षण लॅन्सेन्ट अहवालातील निरीक्षणांना पुष्टी देताना डॉक्टरांनी नोंदवले आहे.
आहाराच्या आणि जगण्याच्याही वेगवान सवयींमुळे आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत आहेत. या साऱ्याचा एकत्रित परिणाम वयात येण्याच्या प्रक्रियेवरही होत असून मुलींचे मासिक पाळी येण्याचे वय कमी होत आहे. लॅन्सेट या वैद्यकीय अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. मासिक पाळी आल्यानंतर मुलींच्या शरीरात पाळी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. प्रजनन आरोग्य व पुनरुत्पादन प्रक्रियेसाठी त्यांचे शरीर तयार होत असते. पूर्वी हा बदल १४ ते १५ वर्षांपासून होत होता. आता मात्र हे वय अलीकडे, म्हणजेच दहा ते तेरा वर्षांपर्यंत मागे आले आहे.
करिअरसाठी उशिरा होणारे विवाह, वाढत्या वयामध्येही मूल होऊ न देण्याचा निर्णय़, उशिरा होणारी बाळंतपणे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम पुढील पिढीवर होताना दिसत आहे. कमी वयात येणाऱ्या मासिक पाळीमुळे मुली लहान वयात मोठ्या दिसू लागतात. त्यांची शारीरिक वाढ जलद होत असली तरीही मानसिक व भावनिक समज सक्षम होत नाही. त्यामुळे प्रजनन आरोग्याशी संबधित माहिती सोप्या प्रकारे त्यांना सांगणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पूर्वी किशोरवयीन वयोगट हा १० ते १९ वर्ष होता. आता वयात येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होत असल्याने हा वयोगट १० ते २४ असा प्रमाणित धरण्यात यावा, असेही निरीक्षण किशोरवयीन आणि आरोग्य या गटात केलेल्या अभ्यासात मांडण्यात आला आहे. सुसान एम सॉवर यांनी केलेल्या या अभ्यासामध्ये विविध देशांमध्ये हा किशोरवयीन वयोगटांमध्ये हा प्रभाव आढळून आला आहे. यासंदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली मोहिते म्हणाल्या,'मुंबईसारख्या शहरांमध्ये हा बदल सर्रास दिसून येतो. पूर्वी मुलींचे वयात येण्याचे वय १५ होते, आता ते ११ इतकेही दिसते. मात्र पाळी त्याहून अधिक लवकर येत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.'
मासिक पाळी लवकर आल्यामुळे काहीवेळा नैराश्य, एकटेपणा जाणवण्याची शक्यता असते. तर काही मुलींमध्ये उंचीसाठी जी संप्रेरके गरजेची असतात, ती पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळे मुलींची उंची वाढत नाही. मस्तिष्क, स्त्रीबीजकोष आणि बीजांड यांची एकमेकांशी निगडित साखळी तयार होऊन त्याचाही परिणाम अंतर्गत व बाह्य वाढीवर होत असतो.
महानगरांत अधिक प्रमाण
या अहवालामध्ये दिलेली निरीक्षणे प्रत्यक्षात भारतातील महानगरांतील मुलींमध्ये दिसू लागली आहेत. पूर्वी मुलग्यांचे वयात येण्याचे प्रमाण मुलींपेक्षा दोनेक वर्ष पुढे होते. आता तेही मागे सरकताना दिसते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी 'काही मुलींमध्ये मासिक पाळीची सुरवात होते, मात्र त्यानंतर ती अनियमित होते. त्यात सातत्य राहत नाही. अतिरिक्त रक्तस्त्राव आणि पोटात तीव्र वेदना होतात. त्यामुळे दहा वर्षांच्याही आधी पाळी येत असेल तर यासाठीही डॉक्टरांची मदत घ्यायला हवी,' असे सांगितले. बाह्य घटकांमध्येही मेंदूतल्या संप्रेरकांना चेतावणी देणारे अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळेही मासिक पाळी लवकर येते, असे निरीक्षण लॅन्सेन्ट अहवालातील निरीक्षणांना पुष्टी देताना डॉक्टरांनी नोंदवले आहे.