राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थाची भूमिका द्यावी, अशी विनंती करणारे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिले आहे. गडकरी यांना ही जबाबदारी दिल्यास ते युतीधर्माचे पालन तर करतीलच, शिवाय सत्ता स्थापनेचा पेचही सोडवतील असा विश्वास आम्हाला वाटतो, असेही तिवारी म्हणाले. सध्या निर्माण झालेला पेच सोडवला गेल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रथम ३० महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवून त्यानंतर उर्वरित काळासाठी मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षाला देण्यात येऊ शकेल, असे तिवारी म्हणाले.
‘गडकरींकडे द्या मध्यस्थाची जबाबदारी’
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थाची भूमिका द्यावी, अशी विनंती करणारे पत्र शिवसेना ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 4:00 am