म. टा. प्रतिनिधी, मुंबई
‘काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून, सत्ता मिळविण्यासाठी भाजप कधीच काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नाही’, असे स्पष्ट करत, ‘ज्यांना कोणाला काँग्रेससोबत जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. आम्ही त्यांना रोखणार नाही’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाव घेता शिवसेनेला लगावला. भाजपबरोबर न जाता आपला महापौर करण्यासाठी प्रयत्नात काँग्रेसची मदत घेण्याच्या तयारीत शिवसेना असल्याची राजकीय चर्चा असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत एकप्रकारे शिवसेनेची कोंडी केली आहे.
महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला देदिप्यमान यश मिळाल्यानंतर भाजपच्या नरिमन पॉइंट कार्यालयासमोर शनिवारी विजयाचा जल्लोष साजरा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा होणार, भाजप आणि शिवसेना एकत्र येणार की शिवसेना काँग्रेसची मदत घेणार याबद्दल विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी ‘काँग्रेससारख्या भ्रष्ट पक्षाची साथ शिवसेना घेणार काय’. असा अप्रत्यक्ष सवाल करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
‘शहरी असो की ग्रामीण, राज्याच्या प्रत्येक भागातीन जनतेने या निवडणुकांमध्ये भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रामाणिकपणाचे आणि विश्वासाचे राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींवरील विश्वासाची ही लाट असून ती कधीच ओसरणार नाही’, असे म्हणत, भाजपाला मिळालेल्या या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचेही आभार मानले. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र यापुढेही घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
‘भाजपचे यश शिवरायांचरणी’
‘महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील यश आपण किल्ले रायगडावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आलो’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या विजयी जल्लोषात बोलताना सांगितले.
राज्यातील सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची बेरीजही भाजपच्या नगरसेवकांपेक्षा कमीच भरते इतके यश मिळाले आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सर्वच ठिकाणी भाजप एक क्रमांकाचा पक्ष बनला आहे. समाजातील सर्वच थरातील लोकांनी भाजपवर विश्वास दाखविला आहे. हा विश्वास आम्ही सार्थ करू. शहरी, ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपला पूर्वी लोक शहरी पक्ष म्हणून हिणवायचे. आता मात्र शहरी असो वा ग्रामीण सर्व महाराष्ट्रात भाजपला अपूर्व यश मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासन व भ्रष्टाचारविरोधी धोरणांचा हा विजय असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी यावेळी नमूद केले.
‘काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून, सत्ता मिळविण्यासाठी भाजप कधीच काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नाही’, असे स्पष्ट करत, ‘ज्यांना कोणाला काँग्रेससोबत जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. आम्ही त्यांना रोखणार नाही’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाव घेता शिवसेनेला लगावला. भाजपबरोबर न जाता आपला महापौर करण्यासाठी प्रयत्नात काँग्रेसची मदत घेण्याच्या तयारीत शिवसेना असल्याची राजकीय चर्चा असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत एकप्रकारे शिवसेनेची कोंडी केली आहे.
महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला देदिप्यमान यश मिळाल्यानंतर भाजपच्या नरिमन पॉइंट कार्यालयासमोर शनिवारी विजयाचा जल्लोष साजरा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा होणार, भाजप आणि शिवसेना एकत्र येणार की शिवसेना काँग्रेसची मदत घेणार याबद्दल विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी ‘काँग्रेससारख्या भ्रष्ट पक्षाची साथ शिवसेना घेणार काय’. असा अप्रत्यक्ष सवाल करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
‘शहरी असो की ग्रामीण, राज्याच्या प्रत्येक भागातीन जनतेने या निवडणुकांमध्ये भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रामाणिकपणाचे आणि विश्वासाचे राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींवरील विश्वासाची ही लाट असून ती कधीच ओसरणार नाही’, असे म्हणत, भाजपाला मिळालेल्या या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचेही आभार मानले. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र यापुढेही घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
‘भाजपचे यश शिवरायांचरणी’
‘महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील यश आपण किल्ले रायगडावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आलो’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या विजयी जल्लोषात बोलताना सांगितले.
राज्यातील सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची बेरीजही भाजपच्या नगरसेवकांपेक्षा कमीच भरते इतके यश मिळाले आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सर्वच ठिकाणी भाजप एक क्रमांकाचा पक्ष बनला आहे. समाजातील सर्वच थरातील लोकांनी भाजपवर विश्वास दाखविला आहे. हा विश्वास आम्ही सार्थ करू. शहरी, ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपला पूर्वी लोक शहरी पक्ष म्हणून हिणवायचे. आता मात्र शहरी असो वा ग्रामीण सर्व महाराष्ट्रात भाजपला अपूर्व यश मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासन व भ्रष्टाचारविरोधी धोरणांचा हा विजय असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी यावेळी नमूद केले.