म. टा. प्रतिनिधी, मुंबई
केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून दहशत निर्माण करण्याचे काम केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता तथा कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. मात्र खोट्या तक्रारी आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, याचा पुनरुच्चार मलिक यांनी केला.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटीसमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असा दावा त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. यामुळेच राज्यात आमचे सरकार आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. माझ्या जावयावर आरोप करण्यात आले असून त्याविरोधात मी न्यायालयात लढत आहे. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, असा प्रश्नही मलिक यांनी केला.
भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी हे स्वत:ला हिंदूंचे नेते म्हणवून घेतात. त्यात आता मनसेचे नेते राज ठाकरे यांची भर पडली. ही चांगली गोष्ट आहे. धर्माच्या आधारावर आम्ही कधीच राजकारण करीत नाही, असे मलिक म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून दहशत निर्माण करण्याचे काम केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता तथा कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. मात्र खोट्या तक्रारी आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, याचा पुनरुच्चार मलिक यांनी केला.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटीसमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असा दावा त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. यामुळेच राज्यात आमचे सरकार आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. माझ्या जावयावर आरोप करण्यात आले असून त्याविरोधात मी न्यायालयात लढत आहे. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, असा प्रश्नही मलिक यांनी केला.
भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी हे स्वत:ला हिंदूंचे नेते म्हणवून घेतात. त्यात आता मनसेचे नेते राज ठाकरे यांची भर पडली. ही चांगली गोष्ट आहे. धर्माच्या आधारावर आम्ही कधीच राजकारण करीत नाही, असे मलिक म्हणाले.